शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सीईओंची प्रकाशा बॅरेजला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  प्रकाशा, ता.शहादा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी भेट देऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  प्रकाशा, ता.शहादा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी भेट देऊन बॅरेज प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत विभागाचीदेखील माहिती जाणून घेत अधिका:यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळसदृश्य स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करावे यासाठी ही भेट दिल्याचे सांगण्यात आले.याबाबत वृत्त असे की, चिपळूण  तालुक्यात झालेल्या धरण फुटीनंतर प्रकाशा बॅरेजच्या पाहणीसाठी अधिका:यांच्या भेटी वाढल्या आहेत. धुळे येथील कार्यकारी अभियंता एस.जी. शहापुरे यांनी प्रकाशा बॅरेजला भेटी देऊन वरिष्ठांना सूचना दिल्यात.  यानंतर जळगावचे अधीक्षक अभियंता एस.जी. वंजारी यांनी पाहणी करून सर्व अधिका:यांना धारेवर धरत मुख्यालयी राहण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, शुक्रवारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बॅरेजला भेट देत पाहणी केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी टी.टी. गोसावी, बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुरे, बॅरेजचे सहाय्यक अभियंता वरूण जाधव, पियुष पाटील, जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, अरुण वरसाळे, दिलीप पाटील, नंदकिशोर पटेल, गजानन भोई, रामबाबा पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी गावाची पाहणी करीत मुख्य कार्यकारी अधिका:यांनी बॅरेजची पाहणी केली. पाण्याची लेव्हल काय आहे ते जाणून घेतले. यानंतर त्यांनी एका गेटजवळ उभे राहून गेट ऑपरेट करण्यास सांगितले. गेट वर घेण्यापूर्वी हॉर्न वाजवला जातो का याची खात्री केली. त्याचप्रमाणे गेट खाली-वर करताना काही अडचणी आहेत का हे ही प्रत्यक्ष पाहिले. बॅरेजवर स्थापत्य विभागाचे वरूण जाधव, सुनील भिल यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. या वेळी यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅरेजचे गेट वर-खाली करताना अडचण येऊ नये यासाठी लवकरच ग्रीसिंग व ऑईलिंगचे काम करण्याच्या सूचना देत पावसाळा सुरू असेर्पयत गेट वर करून कामाला लागावे. हे करताना शेतक:यांनाही विश्वासात घेऊन काम करावे आणि पावसाळा संपण्याच्या अगोदर गेट डाऊन करून पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, असे सांगितले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, हातचे पाणी वाया जावू नये यासाठी अधिका:यांनी दक्ष राहून योग्य ते  नियोजन करावे, असे सांगितले. या बॅरेजलगतच केदारेश्वर मंदिर  असून मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्यासह मंदिराचे सदस्यांनी बॅरेज परिसरात वृक्ष लागवड केली.