शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सौर ऊर्जेने झळाळतेय जिल्हा परिषदेची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ऊर्जेने झळाळू लागली असून ५० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प येथे कार्यान्वित झाल्याने हे शक्य झाले आहे़ जिल्ह्यात प्रथमच एखाद्या शासकीय कार्यालयावर अशा प्रकाराची सुविधा निर्माण करुन वीज बचत केली गेली आहे़ प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देत माहिती घेतली़कोळसा, डिझेल, पेट्रोल, गॅस यासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर भविष्यातील त्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे़ पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा होणारा अतिवापर रोखण्यासाठी शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा हा एक स्त्रोत वापरण्यासाठी विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. या स्त्रोताचा वापर केल्यामुळे वीज बिलाची बचत होऊन पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासालाही आळा घालता येणार आहे़ या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रकारच्या प्रशासकीय मंजुरीनंतर जिल्हा परिषद आवारातील वाहनतळाच्या छपरावर ५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाच्या अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर डी. एच. चौधरी, उप अभियंता इंजिनिया बी. के. जगदाळे, कनिष्ठ अभियंता इंजिनियर प्रमोद भदाणे, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे सहप्रमुख किशोर पाटील यांनी प्रकल्पासाठी परिश्रम घेतले़४जिल्हा परिषद इमारतीमधील चार मजल्यात विविध १७ विभागांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची कार्यालये, दोन लहान व एक मोठे सभागृह आणि इतर अधिकाºयांची कार्यालये आहेत़ या सर्व ठिकाणांना दररोज ६०० युनिट तर प्रतिमाह सरासरी दहा हजार युनिट विजेची गरज लागते़ वीजेची ही गरज भागवण्यासाठी ५० किलो वॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करुन दररोज सुमारे २०० युनिट निर्मिती होईल असा हा प्रकल्प आहे़४नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीला एक्सप्रेस फिडरने दोन वषार्पासून वीज पुरवठा केला जातो़ गरज भासल्यास जनरेटरची सोय आहे. परंतू या प्रकल्पामुळे इमारतीत अखंड वीज पुरवठा होणार आहे़ ३८ लाख रुपये खर्च करुन तयार केलेल्या या प्रकल्पामुळे शासनाचा विजेवरचा दर महिन्याचा ५० हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे़ आॅन ग्रीड पद्धतीने बसवलेल्या या सोलर रूफ टॉप सिस्टीममुळे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तयार होणारी अतिरिक्त वीज थेट वीज महामंडळाला पुरविली जाणार आहे. भविष्यात जिल्हा परिषद इमारतीला आवश्यक असलेला संपूर्ण वीजपुरवठा सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी नियोजन केले जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पावर केला गेलेला खर्च दोन ते तीन वर्षात वीज बिलाच्या माध्यमातून वसूल होऊन, जिल्हा परिषद प्रशासनाचा वीज बिलावरील खर्च यापुढे कमी होणार आहे.