शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

सौर ऊर्जेने झळाळतेय जिल्हा परिषदेची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ऊर्जेने झळाळू लागली असून ५० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प येथे कार्यान्वित झाल्याने हे शक्य झाले आहे़ जिल्ह्यात प्रथमच एखाद्या शासकीय कार्यालयावर अशा प्रकाराची सुविधा निर्माण करुन वीज बचत केली गेली आहे़ प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देत माहिती घेतली़कोळसा, डिझेल, पेट्रोल, गॅस यासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर भविष्यातील त्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे़ पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा होणारा अतिवापर रोखण्यासाठी शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा हा एक स्त्रोत वापरण्यासाठी विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. या स्त्रोताचा वापर केल्यामुळे वीज बिलाची बचत होऊन पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासालाही आळा घालता येणार आहे़ या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रकारच्या प्रशासकीय मंजुरीनंतर जिल्हा परिषद आवारातील वाहनतळाच्या छपरावर ५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाच्या अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर डी. एच. चौधरी, उप अभियंता इंजिनिया बी. के. जगदाळे, कनिष्ठ अभियंता इंजिनियर प्रमोद भदाणे, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे सहप्रमुख किशोर पाटील यांनी प्रकल्पासाठी परिश्रम घेतले़४जिल्हा परिषद इमारतीमधील चार मजल्यात विविध १७ विभागांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची कार्यालये, दोन लहान व एक मोठे सभागृह आणि इतर अधिकाºयांची कार्यालये आहेत़ या सर्व ठिकाणांना दररोज ६०० युनिट तर प्रतिमाह सरासरी दहा हजार युनिट विजेची गरज लागते़ वीजेची ही गरज भागवण्यासाठी ५० किलो वॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करुन दररोज सुमारे २०० युनिट निर्मिती होईल असा हा प्रकल्प आहे़४नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीला एक्सप्रेस फिडरने दोन वषार्पासून वीज पुरवठा केला जातो़ गरज भासल्यास जनरेटरची सोय आहे. परंतू या प्रकल्पामुळे इमारतीत अखंड वीज पुरवठा होणार आहे़ ३८ लाख रुपये खर्च करुन तयार केलेल्या या प्रकल्पामुळे शासनाचा विजेवरचा दर महिन्याचा ५० हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे़ आॅन ग्रीड पद्धतीने बसवलेल्या या सोलर रूफ टॉप सिस्टीममुळे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तयार होणारी अतिरिक्त वीज थेट वीज महामंडळाला पुरविली जाणार आहे. भविष्यात जिल्हा परिषद इमारतीला आवश्यक असलेला संपूर्ण वीजपुरवठा सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी नियोजन केले जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पावर केला गेलेला खर्च दोन ते तीन वर्षात वीज बिलाच्या माध्यमातून वसूल होऊन, जिल्हा परिषद प्रशासनाचा वीज बिलावरील खर्च यापुढे कमी होणार आहे.