शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

आरोग्य सेवा बळकट करणारे वर्ष, राज्य सरकारची वर्षपुर्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:37 IST

n  रमाकांत पाटील     लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :    राज्यातील शिवसेना, कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस या महाआघाडी सरकारचे एकवर्ष ...

n  रमाकांत पाटील    लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :    राज्यातील शिवसेना, कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस या महाआघाडी सरकारचे एकवर्ष पुर्ण होत असून या वर्षभरात जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकट करणाऱ्या विविध योजना  जिल्ह्याला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या शासनाची महत्वाकांक्षी कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील २३ हजारापेक्षा अधीक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. त्याचबरोबर उपसा योजनासह अनेक योजनांना निधी न मिळाल्याने त्या रखडल्याच आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एक वर्ष पुर्ण करीत आहे. या वर्षभराच्या आढावा घेतल्यास जिल्ह्याच्या वाट्याला आरोग्याच्या योजना पदरी पडल्या आहेत. या वर्षभराच्या कालावधीत जवळपास आठ महिने कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न अधीक बिकट झाला होता. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचा व पालकमंत्र्यांचा पाठपुराव्याने जिल्ह्यासाठी आधुनिक कोविड तपासणी लॅब, ऑक्सीजन प्रकल्प, डायलिसीस युनिट, दहा हायक्लोकॅन्यूला मशीन  अशा महत्वाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले महिला रुग्णालयाची इमारत पुर्ण झाली. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षापासून ऐरणीवर होता. हे महाविद्यालय या वर्षात सुरू झाले असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी केंद्रांचेही योगदान आहे. राणीपूर, ता.शहादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत या काळात पुर्ण झाली. अतीदुर्गम भागात रस्ते नसल्याने रुग्णांना झोळीतून न्यावे लागते. त्यावर मार्ग काढण्यासाठी दहा बाईक ॲब्यूलन्स ला मंजुरी मिळाली आहे. या  ॲब्यूलन्स कार्यान्वीत झाल्या नसल्या तरी येत्या काही दिवसात ते येणार आहेत. एकुणच सर्वात मागास असलेल्या या भागातील  आरोग्य सेवा  बळकट करणा-या अनेक सुविधा या वर्षात मिळाल्याने ते जिल्ह्यासाठी फायद्याचे ठरले आहे. कोरोनामुळे स्थलांतरीत मजुरांना आणण्यात सरकारचे योगदान निश्चीत राहिले. या मजुरांना रोहयोचे कामे उपलब्ध करून देण्यात आले. सर्वाधिक म्हणजे ६४ हजारपर्यंत मजुर या कामांवर नोंदविण्यात आले होते. या बरोबरच शेतकरी कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. या योजनांमुळे महाआघाडी सरकारचे हे वर्ष दिलासादायक असले तरी भौतिक विकासाचे प्रकल्प मात्र सर्वच रखडले आहेत. रस्त्यांची साधी दुरूस्ती न झाल्याने या वर्षात जिल्ह्यातील जनतेचा प्रवास खड्डेमय रस्त्यातूनच सुरू आहे. उपसा योजना या वर्षी तरी मार्गी लागतील अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांची या वर्षीही निराशा झाली आहे. बॅंकांचे कर्ज वितरणाबाबतही योग्य नियोजन नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जापासून वंचीत राहावे लागले. काही वर्षांपासून सुरू झालेल्या विकास प्रकल्पांना निधी न मिळाल्याने त्या प्रकल्पांच्या कामांना चालना मिळू शकली नाही. वार्षीक योजना, स्थानिक विकास निधी कार्यक्रम यासारख्या योजनांचा निधी कपात करण्यात आला. त्यामुळे विकास कामांना खिळ बसली. कोरोनाकाळात दुर्बल घटक व आदिवासींना मदत देण्यासाठी मंजुर करण्यात आलेली खावटी कर्ज योजनेसाठीही निधी न मिळाल्याने अनेक लाभार्थींना त्यापासून वंचीत राहावे लागले आहे.