शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

यंदा 140 टक्के पाऊस होऊनही चार गावांना टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात झालेल्या 140 टक्के पावसामुळे यंदा एकाही गावात पाणी टंचाईची झळ पोहचणार नाही अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात झालेल्या 140 टक्के पावसामुळे यंदा एकाही गावात पाणी टंचाईची झळ पोहचणार नाही अशी शक्यता असतांना भुजल सव्र्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार चार गावांना संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली गेली आहे. दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे चारा पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगाम संपेर्पयत चा:याचीही समस्या काही प्रमाणात राहणार आहे.   अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, उमर्टी, पिमटी व भरकुंड या चार गावांचा संभाव्या पाणी टंचाईत समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून सरासरीचा कमी पाऊस पाऊस होत असल्यामुळे दरवर्षी किमान दीडशे ते जास्तीत जास्त 350 गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. गेल्या वर्षाचा दुष्काळाने तर संपुर्ण जिल्हाच होरपळला होता. त्या कटू आठवणी यंदाच्या पावसाळ्याने पुसून काढल्या आहेत. यंदा एवढा पाऊस झाला की कुपनलिका, विहिरी ओव्हरफ्लो झाल्या, धरणे ओसंडून वाहू लागली, अद्यापही शेतांमध्ये ओल कायम   आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील एकाही गावामध्ये पाणी टंचाईची समस्या राहणार नाही असे वाटत असतांनाच अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात सर्वात कमी पाऊसयंदाच्या पावसाळ्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी टक्केवारी ओलांढली आहे. असे असले तरी अक्कलकुवा तालुक्यात सर्वात कमी अर्थात केवळ 102 टक्केच पाऊस झाला आहे. तो देखील अनियमित स्वरूपाचा होता. त्यामुळे या तालुक्यात टंचाई जाणवणार अशी शक्यता होती. त्यानुसार भुजल सव्र्हेक्षण विभागाने केलेल्या निरिक्षण विहिरींच्या निरिक्षणानुसार अक्कलकुवा तालुक्यातीलच चार गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. उपसा करण्यास बंदीमहाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 च्या कलम 25 नुसार अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, उमटी, पिमटी व भरकुंड ही चार गांवे संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गांवे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे या गावांच्या परिसरात कलम 26 अन्वये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक कि.मी. च्या क्षेत्रात असलेल्या अन्य कोणत्याही स्त्रोतापासून पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त उपसा करणेस     बंदी घालण्यात येत आहे. तसे आदेशच तळोदा विभागाचे      सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.  दरवर्षी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते. यंदा या भागात देखील चांगला पाऊस झाला आहे. शिवाय लहान,मोठे बंधारे, धरणे भरलेली आहेत. विहिरींना देखील पाणी आहे. त्यामुळे यंदा या भागात पाणी टंचाई नसल्याची स्थिती आहे. अनेक वर्षानंतर या भागात पाणी टंचाईंचे संकट टळले आहे. यंदा केवळ अक्कलकुवा तालुक्यातील चारच गावांच्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे ही चार गावे आगामी काळात अर्थात दुस:या टप्प्यापासून टंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यात येणार आहे.