शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

आकांक्षीत नंदुरबार जिल्हा उपक्रमांतर्गत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निती आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून नंदुरबारची निवड केली. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आदी विभागांच्या कामांमध्ये सुधारणा करणे व निर्देशांकात वाढ करणे यासाठी जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने दोन दिवसीय कार्यशाळा मंगळवारी नंदुरबारात सुरूवात झाली. बुधवारी या कार्यशाळेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निती आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून नंदुरबारची निवड केली. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आदी विभागांच्या कामांमध्ये सुधारणा करणे व निर्देशांकात वाढ करणे यासाठी जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने दोन दिवसीय कार्यशाळा मंगळवारी नंदुरबारात सुरूवात झाली. बुधवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.केंद्र शासनाच्या निती आयोगाने नंदुरबार जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा म्हणून निवड केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत 2018 ते 2022 दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य, पोषण,  शिक्षण आणि पाणी व स्वच्छता इत्यादी विभागाशी संबंधीत निर्देशांकात सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफच्या सहकार्याने 3 व 4 जुलै 2018 या दोन दिवसीय अमृतमंथन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरार्पयतचे विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात आलेला आहे.मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. सोमवंशी, तळोदा प्रकल्प अधिकारी विनय गौडा, नंदुरबार प्रकल्पाधिकारी वनमती, युनिसेफ, पिरॅमल, टाटा ट्रस्टचे राज्यस्तरीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी आरोग्य विभाग व महिला बालविकास विभाग यांच्यातर्फे उपस्थित अधिका:यांना आवळ्याची रोपे देवून पोषण बाबत संदेशपर भेटवस्तू देण्यात आल्यात. प्रास्ताविकात डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आकांक्षीत जिल्हा नंदुरबारने आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता यात विकास साधण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरार्पयत प्रत्येक व्यक्तीने सहभागी होवून मानव विकास निर्देशांक अभूतपूर्व बदल करण्याचे आव्हान त्यांनी केले. यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनी दोन दिवसीय कार्यशाळेत सर्व अधिका:यांनी सुक्ष्म नियोजन प्रक्रियेत सहभागी होवून तालुकानिहाय कृषी आराखडा तयार करावा तसेच 100 टक्के अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे याबाबत आव्हान केले.अमृतमंथन कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी असे एकूण 280 सहभागींनी भाग नोंदविला आहे. कार्यशाळेत तालुकानिहाय निती आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येणा:या अडचणी व त्यावरील उपाययोजना शोधण्याचे काम या दोन दिवसीय कार्यशाळेत करण्यात येणार आहे. त्यानंतर या कृती आराखडय़ावर आधारीत कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी युनिसेफ मुंबईद्वारे विविध विभागातील तज्ञ मंडळी जिल्ह्यात उपस्थित झालेले असून, त्यांनी दिवसभात उपस्थितांना नंदुरबार जिल्ह्याची सद्य:स्थितीची जाणीव करून देत परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी करावयाच्या कृतीबाबत गटा-गटात बसून चर्चा करणे व निर्देशांकनिहाय अडचणी व त्यावर उपाययोजना शोधण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.अपर्णा देशपांडे, डॉ.गोपाळ पंडगे, आनंद घोडके, माधवी पांडे, नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी. बोडके, राज्य पोषण अधिकारी, पिरामल फाऊंडेशन आदी उपस्थित होते.