शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाणी शहरातील विविध भागात पसरून नवीन वसाहत व शहरातील डोंगरगाव रोड परिसरात गुडघाभर पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला होता.शहरातील पटेल रेसिडेन्सी चौक, दर्गा परिसर, विश्रामगृह चौक, दोंडाईचा रस्ता, सदाशिव नगर, रामदेवबाबा नगर, साईबाबा नगर आदी परिसरातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नवीन वसाहतीतील साठलेले पाणी कमी होत असून नवीन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. डोंगरगाव रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व याच परिसरात मोठे व्यापारी संकुल असल्याने त्यांच्या तळघरात पाणी साचले होते. ते पाणी खाली करण्यासाठी नागरिकांना डिङोल पंपाचे सहाय्य घ्यावे लागत आहे. या पंपाच्या सहाय्याने तळघरातील पाणी खाली करण्यात येत आहे. घरे व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सारंगखेडा परिसरातपंचनाम्यांना गती द्यावीसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व  पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.   महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येथील कृषी सहायक  के.डी. नाईक हे पिकांचे झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करीत आहेत. या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाने जास्त कर्मचारी नेमून पंचनाम्याच्या कामांना गती द्यावी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांनी केली आहे.असलोद येथे 20 घरांच्यानुकसानीचे पंचनामेअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. असलोद गावात  20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी सुरेखा राठोड यांनी केले. तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दुधखेडा गावालगत फरशी तुटल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. असलोद येथील जलवाहिनी तुटल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दुधखेडा धरण पूर्ण भरले आहे. असलोद परिसरातील इतर गावांमध्येही घरांची पडझड झाली असून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. मात्र शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने ते करण्याची मागणी होत आहे.