शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाणी शहरातील विविध भागात पसरून नवीन वसाहत व शहरातील डोंगरगाव रोड परिसरात गुडघाभर पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला होता.शहरातील पटेल रेसिडेन्सी चौक, दर्गा परिसर, विश्रामगृह चौक, दोंडाईचा रस्ता, सदाशिव नगर, रामदेवबाबा नगर, साईबाबा नगर आदी परिसरातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नवीन वसाहतीतील साठलेले पाणी कमी होत असून नवीन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. डोंगरगाव रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व याच परिसरात मोठे व्यापारी संकुल असल्याने त्यांच्या तळघरात पाणी साचले होते. ते पाणी खाली करण्यासाठी नागरिकांना डिङोल पंपाचे सहाय्य घ्यावे लागत आहे. या पंपाच्या सहाय्याने तळघरातील पाणी खाली करण्यात येत आहे. घरे व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सारंगखेडा परिसरातपंचनाम्यांना गती द्यावीसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व  पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.   महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येथील कृषी सहायक  के.डी. नाईक हे पिकांचे झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करीत आहेत. या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाने जास्त कर्मचारी नेमून पंचनाम्याच्या कामांना गती द्यावी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांनी केली आहे.असलोद येथे 20 घरांच्यानुकसानीचे पंचनामेअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. असलोद गावात  20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी सुरेखा राठोड यांनी केले. तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दुधखेडा गावालगत फरशी तुटल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. असलोद येथील जलवाहिनी तुटल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दुधखेडा धरण पूर्ण भरले आहे. असलोद परिसरातील इतर गावांमध्येही घरांची पडझड झाली असून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. मात्र शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने ते करण्याची मागणी होत आहे.