शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

तापी-बुराई योजनेचे काम शनिमांडळपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बसवंत स्वामी, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, माजी आमदार     चंद्रकांत रघुवंशी, उदेसिंग पाडवी, जि.प.चे उपाध्यक्ष राम रघुवंशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, पाईपलाईनद्वारे पहिल्या टप्प्यातील नियोजित ठिकाणी पाणी साठवण करण्याची सुविधा करण्यास कालावधी लागणार असल्याने सदर सुविधा होईपर्यंत शनिमांडळपर्यंत पाणी आणल्यास परिसरातील गावांना याचा लाभ होऊ शकेल. तसेच ठाणेपाडा-२ मध्ये पाणी आणून नंदुरबार शहराला टंचाई प्रसंगी पाणी देता येईल यासाठी व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील २२ राज्यस्तरीय सहकारी उपसा सिंचन योजनेची आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर पाईपलाईनमध्ये गळती झाल्यास तिच्या दुरुस्तीच्या तरतूदीसह प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी. २४ तासाच्या आत गळती दुरूस्ती होईल अशी यंत्रणा असणे गरजचे आहे. या योजनेच्या     आवश्यक कामाबाबत लवकरच    मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नवापूर तालुक्यातील पूर्ण झालेल्या योजनांचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही पाटील म्हणाले. यावेळी लघु पाटबंधारे योजना, देहली, नागन, दरा, कोरडी, रामपूर, रापापूर, इच्छागव्हाण,  पानबारा, उकाई धरणातील पश्चजलातून पाणी उपसा सिंचनद्वारे वापरणे, नर्मदा-तापी वळण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, दुपारी होणारी बैठक सायंकाळी उशीरा झाल्याने सर्व अधिकारी ताटकळत बसले होते.