शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

ब्राह्मणपुरी : प्रमुख अंतरराज्यमार्ग असणाऱ्या शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळ असणाऱ्या पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने पावसात त्याला तळ्याचे स्वरूप ...

ब्राह्मणपुरी : प्रमुख अंतरराज्यमार्ग असणाऱ्या शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळ असणाऱ्या पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने पावसात त्याला तळ्याचे स्वरूप येत असते. हा खड्डा गेले अनेक महिन्यापासून तसाच असल्याने कोणी लक्ष देणार आहे की नाही, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.

कोळदा-खेतिया या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आले होते. यामार्गावरील काम मोठ्या प्रमाणावर पूर्ततेकडे आले असून, सुसरी धरणाच्या वळण रस्त्यावरील काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. प्रत्येक पावसात त्या खड्ड्याचे आकारमान वाढत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार होती त्यामुळे डबके भरून वाहत होते. वाहनधारक, शेतकरी यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य प्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, याच रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची सतत वर्दळ होत असते. निंदान नुसते खड्डे भरून मलमपट्टी तरी करा अशी मागणी वाहनधारकांडून करण्यात येत आहे.

या पुलावरील मोठ्या खड्ड्याबरोबरच सुसरी धरण वळण रस्त्यावर अनेक छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्यांचेही काम होणे आवश्यक आहे. पुलावर तर मोठमोठे खड्डे पडल्याने किरकोळ पावसातदेखील रस्ता जलमय होत आहे. पावसाने पुलावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, या पुलासह रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दराफाटा-म्हसावद रस्ता खड्यात

धडगाव, तोरणमाळकडे जाणाऱ्या दराफाटा-म्हसावद रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे असभ्य दुर्लक्ष झाले असून, यामुळे वाहनधारकांना आपला जीवदेखील गमावला लागला असून, अजून कित्येक जणांचा जीव जाण्याची वेळ पाहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांकडून उमटत असून, खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे.