शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यातील ९२ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ...

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात दोन पाड्यांवर यंदाही टँकर लागणार आहे. येत्या काही दिवसांत येथे टँकर सुरू करण्याच्या हालचालींना गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, टंचाई निवारण आराखड्यात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आहे. पंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्यात आल्यानंतर येथे पाणीपुरवठा योजना मंजुरी किंवा दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनांसोबत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधन विहिरींचे पुन्हा खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विंधन विहिरींचे खोदकाम अद्याप सुरू झालेले नसले तरी टंचाईग्रस्त गावांमध्ये या विहिरी खोदल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अक्कलकुंवा तालुक्यातील काही पाड्यांवर स्थिती भीषण होणार आहे.

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

जिल्हा प्रशासनाकडून डिसेंबर महिन्यापासून चार टप्प्यांचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात ९२ गावे व १८८ पाडे टंचाईग्रस्त असल्याने याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत. यातील अनेक गावांमध्ये सध्या कामही सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोन पाड्यांवर टँकर

धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर दिले जाणार आहे. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

पाच तालुके टँकरमुक्त; पण...

जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळता तळोदा, शहादा, अक्कलकुंवा, नंदुरबार आणि नवापूर हे पाच तालुके टँकरमुक्त आहेत; परंतु मे ते जुलै या काळात पावसाने योग्य वेळी हजेरी न दिल्यास अक्कलंकुवा आणि नंदुरबार तालुक्यांतील गावांमध्ये येत्या काळात टंचाई निर्माण होणार आहे.

विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील विविध भागांत टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव आहेत. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार, तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुंवा तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विहिरीतून त्या-त्या गावांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.