शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९२ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ...

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात दोन पाड्यांवर यंदाही टँकर लागणार आहे. येत्या काही दिवसांत येथे टँकर सुरू करण्याच्या हालचालींना गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, टंचाई निवारण आराखड्यात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आहे. पंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्यात आल्यानंतर येथे पाणीपुरवठा योजना मंजुरी किंवा दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनांसोबत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधन विहिरींचे पुन्हा खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विंधन विहिरींचे खोदकाम अद्याप सुरू झालेले नसले तरी टंचाईग्रस्त गावांमध्ये या विहिरी खोदल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अक्कलकुंवा तालुक्यातील काही पाड्यांवर स्थिती भीषण होणार आहे.

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

जिल्हा प्रशासनाकडून डिसेंबर महिन्यापासून चार टप्प्यांचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात ९२ गावे व १८८ पाडे टंचाईग्रस्त असल्याने याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत. यातील अनेक गावांमध्ये सध्या कामही सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोन पाड्यांवर टँकर

धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर दिले जाणार आहे. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

पाच तालुके टँकरमुक्त; पण...

जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळता तळोदा, शहादा, अक्कलकुंवा, नंदुरबार आणि नवापूर हे पाच तालुके टँकरमुक्त आहेत; परंतु मे ते जुलै या काळात पावसाने योग्य वेळी हजेरी न दिल्यास अक्कलंकुवा आणि नंदुरबार तालुक्यांतील गावांमध्ये येत्या काळात टंचाई निर्माण होणार आहे.

विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील विविध भागांत टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव आहेत. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार, तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुंवा तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विहिरीतून त्या-त्या गावांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.