शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अवघा ३५ टक्के टंचाईचे भीषण संकट, जमिनीतील पाणी पातळीही जातेय खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

पाणीसाठा झालाच नाही यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ३७ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. पाऊसच नसल्याने नदी, नाले ...

पाणीसाठा झालाच नाही

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ३७ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. पाऊसच नसल्याने नदी, नाले प्रवाही झाले नाहीत. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक झालीच नाही. परिणामी पाणीसाठा वाढण्याऐवजी तो कमी झाल्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे. यंदा जून महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा ४४ टक्के होता. तो कमी होऊन आता ३५ टक्क्यांवर आला आहे.

रब्बी हंगामाला फटका बसणार

प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अशीच राहिल्याच रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. कारण जिल्ह्यातील काही प्रकल्पांमधील पाण्याचे आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडले जाते. त्या माध्यमातून काही शेतकरी पाणी घेतात. शिवाय नदी, पाटचारी यांना पाणी सोडण्यात आल्यावर त्या त्या भागातील विहिरी व कूपनलिकांना देखील बऱ्यापैकी पाणी येते. त्यावर शेतकरी रब्बीचे पीक घेत असतात. यंदा मात्र एकुणच चित्र बिकट राहण्याची शक्यता आहे.

जमिनीतील पाणी पातळी खालावली

पाऊस नाही, प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नाही त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी पाऊस असल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावलेली नव्हती. यंदा ती दीड ते दोन मीटर किंवा त्यापेक्षा अधिक खालावण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभाग पावसाळ्यानंतर निर्धारित केलेल्या निरीक्षण विहिरीतून पाणीपातळीची निश्चिती करीत असतात.

अनेक गावांना संकट

जिल्ह्यातील अनेक गावांत आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात पाणी टंचाई कृती आराखडा अंतर्गत ७८ गावांना टंचाई होती. यंदा ही संख्या तीन ते चार पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.