शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी वॅाटर ऑडीटला नंदुरबारात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 21:57 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिकेतर्फे २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना तयार करण्यात येत असून त्यासाठी शहरातील वाॅटर ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिकेतर्फे २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना तयार करण्यात येत असून त्यासाठी शहरातील वाॅटर ऑडीट तयार केले जात आहे. याकरीता बाहेरील संस्था नेमण्यात आली असून घरोघरी जाऊन नळ कनेक्शन विषयी माहिती घेतली जात आहे. एका कुटूंबाला दरडोई किती पाणी लागते त्यानुसार २४ बाय सात ही योजना आकाराला येणार आहे. दरम्यान, ज्यांचे अनधिकृत नळ कनेक्शन असतील त्यांनी ते नियमित अकारणी द्वारेच वैध करून घ्यावे असे आवाहन देखील पालिकेतर्फे करण्यात आले आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक धरण गेल्या दोन वर्षांपासून पुर्ण क्षमतेने भरत आहे. याशिवाय आंबेबारा धरण देखील दरवर्षी ओव्हरफ्लो होत आहे. शिवाय शहरात पाण्याची स्टोरेज क्षमता देखील वाढली आहे.  ही बाब लक्षात घेता येत्या काळात शहरात दररोज २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी मात्र वाॅटर मिटर लावले जाणार आहे. त्याचअंतर्गत आता वाॅटर ऑडीट देखील केले जात आहे.काय आहे योजना२४ बाय ७ या योजनेअंतर्गत प्रत्येक नळ कनेक्शनधारकास वाॉटर मिटर लावले जाणार आहे. दररोज २४ तास नळांना पाणी राहील अशी व्यवस्था असेल. अर्थात प्रत्येक कुटूंब किती पाणी वापर करते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार आता जेवढा पाणीपुरवठा केला जातो तेव्हढेच पाणी पाणी वापरले तरी हजार रुपयांपर्यंतच पाणी पट्टी आकारणी होण्याची शक्यता आहे. जास्तीचे पाणी वापर झाल्यास तेव्हढा जास्तीचा चार्ज द्यावा लागणार आहे. अर्थात तो कमीच ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात ज्या पालिकांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे तेथे ती यशस्वी झालेली आहे. नागरिकांनी देखील त्याचे स्वागतच केले आहे. नंदुरबारवासीयांच्या पसंतीस देखील ही योजना पडेल अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. वाॅटर ऑडीट सुरूशहरात या योजनेकरीता वाॅटर ऑडीट सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी त्रयस्थ संस्था नेमण्यात आली आहे. या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेत आहेत. एक किंवा एकापेक्षा अधीक कनेक्शन असतील तर त्याचीही पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी या सर्व्हेसाठी सत्य माहिती द्यावी जेणेकरून योजनेचा आराखडा आखण्यास मदत होईल असे आवाहन नगराध्यक्षा रत्ना   रघुवंशी यांनी केले आहे. काही नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतले असल्यास ते अधिकृत करून घ्यावे. त्यासाठी कुठलाही अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही असेही पालिकेने याआधीच स्पष्ट केेले     आहे. 

   ८० लाख लिटर पाणी... नंदुरबारातील नळ जोडणीधारकांची संख्या जवळपास १४ हजार ५०० पेक्षा अधीक आहे. या नळजोडणीधारकांना झराळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज किमान ८० लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी पालिकेने शहराच्या चारही बाजूंना जवळपास १५ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

   १५ जलुकुंभद्वारे वितरण शहरात सर्वात जुनी पाण्याची टाकी ही साक्रीनाका परिसरातील आहे. याशिवाय टिळक विद्यालयामागे, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ, माळीवाडा, धुळेनाका, बुस्टरपंप, नवनाथ टेकडी, शांतीनगर, योगेश्वरनगर, नागाईनगर, देवमोगरा कॉलनी, परदेशीपुरा टेकडी, विरलविहार, हाटदरवाजा आदी ठिकाणी जलकुंभ आहेत.  

पालिकेने टंचाईच्या काळात देखील नियमित पाणी पुरवठा केला होता. आता सुदैवाने दोन वर्षांपासून विरचक धरण पुर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे २४ बाय ७ ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. दररोज २४ तास नळांना पाणी  राहील. मिटर बसविण्यात येईल.  परंतु त्याबाबत गैरसमज करण्याचे कारण नाही. याबाबत काहीजण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतीलही. परंतु योजना नागरिकांच्या हिताचीच आहे. आता वाॉटर     ऑडीट सुरू आहे. त्यासाठी सहकार्य करावे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा.