शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कनेक्टीव्हीटीकरिता भर पावसात डोंगरावर भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सध्या कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश अनेक महाविद्यालयात आॅनलाईन प्रणालीद्वारे होत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सध्या कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश अनेक महाविद्यालयात आॅनलाईन प्रणालीद्वारे होत आहेत. सातपुड्यातील तसेच इतर ठिकाणच्या अतिदुर्गम भागातील अनेक विद्यार्थी आॅनलाईन प्रणालीद्वारे शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जेथे इंटरनेट कनेक्टीव्हिटी आहे तेथे जाऊन प्रवेश निश्चित करीत आहेत. परंतु प्रवेश घेतल्यानंतर चालू वर्षीचा अभ्यास करणे या विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी येथील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत, अशा विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे कुठेही बसून, अभ्यास करावा लागत आहेत. या भागात जवळ जवळ कुठेही टॉवर नसल्यामुळे डोंगरावर चढल्या शिवाय उपाय नसतो. सातपुड्यातील अनेक गावात ही समस्या असल्याने याकडे प्रशासन व सरकारने लक्ष देणे आवश्यक आहेत.राज्यातील ८० टक्के शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशीत विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रणालीद्वारे शिकवण्यासही सुरूवात केली आहे. शिवाय खाजगी क्लासेस चालकांनीदेखील आॅनलाईन शिकवण्या सुरू केल्या आहेत. त्यात आताच न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातीलच या निर्णयामुळे या आदिवासी मुलांचे काय हाल होतील.आदिवासी पाड्यांवरील अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे ही पद्धत कुचकामी ठरत आहे. म्हणून याचा फटका अशा विद्यार्थ्यांना बसत आहेत. तरी शिक्षणाची ओढ असलेले विद्यार्थी जेथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी भेटेल तिथे व फक्त ज्यादिवशी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते त्यादिवशी आॅनलाईन तासिकाही बुडतात. तसेच आता पावसामुळे या अडचणीत अधिकच भर पडत असते. तरी दगडगोट्यांवर बसूनही आॅनलाईन प्रणालीचा वापर करून अभ्यास करावा लागत आहेत. सरकारने २१ आॅगस्ट २०२० रोजी केंद्राकडे शैक्षणिक वर्ष बदलण्याचा प्रस्ताव पाठवला असून, राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन, आॅफलाईन जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे अशी, अट घातली असली तरी अतिदुर्गम भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईलची अनुपलब्धता यामुळे ही पद्धत कुचकामी ठरणार आहे. म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य होईल. परंतु त्यासाठी सरकारने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून देणे आवश्यक ठरेल.घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आणि १०० मीटर अंतराचा डोंगर चढून डोंगराच्या शेवटच्या टोकावर चार-पाच दगड आहे. त्या दगडावर उभे राहून लेक्चर पहावे लागते.-सुक्रम काल्या वसावे, द्वितीय वर्ष एम.कॉम, सावित्रीबाई फुले विद्यापीठसध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आम्हाला इथे डोंगरावर येऊन सुध्दा नेटवर्कचा स्पीड जेमतेम १०० ते २०० केबी भेटत असल्यामुळे लेक्चर अटेंड करण आणि लेक्चर डाऊनलोड करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. त्यात तीन ते चार जण एकत्र बसल्यावर तेवढा पण स्पीड भेटत नाहीत.-दिलीप चमाऱ्या पाडवी, बीलिब.एलएससी,हं.प्रा.ठा. कला व रा.या.क्ष. विज्ञान महाविद्यालय, नाशिक.