शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नळगव्हाणला वाघदेव पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या पुढील पिढीतही याची बिजे रोवण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील नळगव्हाण येथे वर्षानुवर्षापासून चालत असलेला निसर्ग देवता तसेच वाघदेवता पूजन कार्यक्रम पार पडला.दरवर्षी जुलै, आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या या पूजन महोत्सवाला आदिवासी बांधवांच्या रूढी परंपरेमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्या गावाच्या समृद्धी तसेच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी निसर्गदेवतेचे पूजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असते. या वेळी शेतशिवारात लावण्यात आलेल्या विविध पिकांचे पूजन करण्यात येत असते.आदिवासी बांधवांच्या सण-उत्सवामध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्व असते. किंबहुना आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात राहूनच त्याच्या साक्षीने आपले विविध सण साजरे करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे निसर्गदेवतेचे होणारे पूजन.आदिवासींच्या दैनंदिन जीवनशैलीचा विचार केला असता, समृद्ध अशा निसर्गाच्या सहवासात राहून आपल्या गरजा या निसर्गच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा कल असतो. त्यामुळे आपल्या विविध उत्सवांमध्ये निसर्गाच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात येत असते.दरम्यान याचाच दुसरा भाग म्हणजे वाघदेवतेचे पूजन होय. सुरूवातीला आदिवासी बांधव जंगलात वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचा नेहमी जंगलातील हिंसक प्राण्यांशी संबंध येत असे. त्यामुळे अशा हिंस्त्र प्राणांना पळवून लावण्यासाठी आदिवासी बांधवांकडून वाघदेवता पूजनाला सुरूवात करण्यात आली. या प्रथे अंतर्गत एका व्यक्तीला घोंगडे घालून वाघ बनविले जाते आणि दुसºया एका व्यक्तीला देव बनविले जाते. त्यांची पूजा करून नेवेद्य दाखवला जातो. यानंतर त्या वाघाचे रूप धारण केलेल्या व्यक्तीला दुसºया गावाच्या शिवारापर्यंत पळवून सोडले जाते. या वेळी त्याला इजा होणार नाही या पद्धतीने मातीचे गोळे बनवून मारण्यात येतात.यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आपला बचाव होऊन ते आदिवासी बांधवांच्या वसाहतीपासून लांबच राहतात, अशी धारणा यामागची आहे. तसेच पूजनासाठी भात आणि रानभाजीच्या नेवैद्याचेही नियोजन यात करण्यात येत असते. यानंतर हे नेवैद्य घरोघरी प्रसाद म्हणून सागाच्या पानात पुड्या बांधून वाटण्यात येत असतो.आपली हजारो वर्षाची प्रथा, परंपरा जोपासण्यासाठी याचे बिजे पुढच्या पिढीत रूजविण्यात येत असतात. कालांतराने यात मोठ्या प्रमाणात बदल होत असले तरी आजपावेतो ही परंपरा टिकवून ठेवण्यामागे आदिवासी बांधवांचा मोलाचा वाटा आहे.