शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

नळगव्हाणला वाघदेव पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या पुढील पिढीतही याची बिजे रोवण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील नळगव्हाण येथे वर्षानुवर्षापासून चालत असलेला निसर्ग देवता तसेच वाघदेवता पूजन कार्यक्रम पार पडला.दरवर्षी जुलै, आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या या पूजन महोत्सवाला आदिवासी बांधवांच्या रूढी परंपरेमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्या गावाच्या समृद्धी तसेच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी निसर्गदेवतेचे पूजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असते. या वेळी शेतशिवारात लावण्यात आलेल्या विविध पिकांचे पूजन करण्यात येत असते.आदिवासी बांधवांच्या सण-उत्सवामध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्व असते. किंबहुना आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात राहूनच त्याच्या साक्षीने आपले विविध सण साजरे करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे निसर्गदेवतेचे होणारे पूजन.आदिवासींच्या दैनंदिन जीवनशैलीचा विचार केला असता, समृद्ध अशा निसर्गाच्या सहवासात राहून आपल्या गरजा या निसर्गच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा कल असतो. त्यामुळे आपल्या विविध उत्सवांमध्ये निसर्गाच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात येत असते.दरम्यान याचाच दुसरा भाग म्हणजे वाघदेवतेचे पूजन होय. सुरूवातीला आदिवासी बांधव जंगलात वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचा नेहमी जंगलातील हिंसक प्राण्यांशी संबंध येत असे. त्यामुळे अशा हिंस्त्र प्राणांना पळवून लावण्यासाठी आदिवासी बांधवांकडून वाघदेवता पूजनाला सुरूवात करण्यात आली. या प्रथे अंतर्गत एका व्यक्तीला घोंगडे घालून वाघ बनविले जाते आणि दुसºया एका व्यक्तीला देव बनविले जाते. त्यांची पूजा करून नेवेद्य दाखवला जातो. यानंतर त्या वाघाचे रूप धारण केलेल्या व्यक्तीला दुसºया गावाच्या शिवारापर्यंत पळवून सोडले जाते. या वेळी त्याला इजा होणार नाही या पद्धतीने मातीचे गोळे बनवून मारण्यात येतात.यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आपला बचाव होऊन ते आदिवासी बांधवांच्या वसाहतीपासून लांबच राहतात, अशी धारणा यामागची आहे. तसेच पूजनासाठी भात आणि रानभाजीच्या नेवैद्याचेही नियोजन यात करण्यात येत असते. यानंतर हे नेवैद्य घरोघरी प्रसाद म्हणून सागाच्या पानात पुड्या बांधून वाटण्यात येत असतो.आपली हजारो वर्षाची प्रथा, परंपरा जोपासण्यासाठी याचे बिजे पुढच्या पिढीत रूजविण्यात येत असतात. कालांतराने यात मोठ्या प्रमाणात बदल होत असले तरी आजपावेतो ही परंपरा टिकवून ठेवण्यामागे आदिवासी बांधवांचा मोलाचा वाटा आहे.