शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला 1 लाख लीटर पाणी देणारं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:59 IST

लोकसहभागाची जलयुक्ती : दोन वर्षात ठाणेपाडा बनलं पाणीदार गाव

भूषण रामराजे ।लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : सर्वत्र जलसंकट तीव्र होत असताना ठाणेपाडा ता़ नंदुरबार येथे ग्रामस्थांना दिवसाला 1 लाख 10 हजार लीटर पाणी वाटप केलं जात आह़े  जलयुक्तच्या माध्यमातून वॉटर बजेट ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणा:या ठाणेपाडा या गावाची ही पाणीदार कहाणी़़़   26 जानेवारी 2016 पासून राज्यात प्रत्यक्ष जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना सुरुवात झाली होती़ यात जिल्ह्यातील इतर गावांसोबतच ठाणेपाडा गावानेही सहभाग नोंदवला होता़ केवळ सहभागावर न थांबता योजनेला लोकसहभागाची युक्ती देत गावाने गावाची भूजल पातळी वाढवली आह़े नंदुरबार शहरापासून दक्षिणेला नाशिक- नंदुरबार रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरचं 3 हजार 488 लोकवस्तीचं टुमदार गाव़ आदिवासी समुदायासह सर्वच जाती धर्माचे 722 कुटूंब याठिकाणी राहतात़ प्रामुख्याने शेती हा व्यवसाय असलेल्या या गावशिवारातील माती काळी परंतु खडकाळ असल्याने कांदा हेच प्रमुख पीक़ तीन वर्षापूर्वी गावात फेब्रुवारी ते जुलै हा कालखंड म्हणजे जलसंघर्षाचा़ गावाची पाणी योजना कोरडी, शिवारातील विहिरी तळ गाठायच्या दरवर्षी पडणा:या या दुष्काळामुळे रब्बी कांदा घेणारे शेतकरी शेवटचा हंगाम सोडून देत होत़े डोंगराळ भागात असल्याने गावाला पाणी मिळणंच दुरापास्त होत होतं़ यावर मात करण्याची संधी येथील ग्रामपंचायतीला जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मिळाली आणि गाव पाणीदार झालं़ गावाच्या जलयुक्तीची माहिती जाणून घेतली असता, अनेक वर्षाचा जलसंघर्ष समजून आला़ गावाच्या दक्षिणेला डोंगरात उंचीवर ‘कापरा’ (ठाणेपाडा 1) हा 40 वर्षापूर्वी वनविभागाच्या हद्दीत बांधलेला तलाव आह़े या तलावाच्या पाण्यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन ठाणेपाडा गावात केले जात होत़े वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्यातून पाणी सहजासहजी मिळत नव्हतं़ यामुळे शेतक:यांनी लघुतलावातून वाहून जाणा:या पाण्याला खालच्या भागातून वाहणा:या नाल्यात आणलं़़ पाणी जिंकण्याची ग्रामस्थांची ही पहिली पायरी़ यातून बव्हंशी टंचाई दूर होत असली तरी परिपूर्ण पाणीपुरवठा होत नव्हता़ ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच देवमन पवार, तत्कालीन ग्रामसेवक विनोद ढोढरे यांनी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या बैठका घेत पाण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिल़े यातून दोन वर्षापूर्वी जलयुक्तची कामे सुरू झाली होती़ यातून ग्रामस्थांनी तांबेबारा (ठाणेपाडा-2) या प्रकल्पाचा  गाळ लोकसहभागातून हाताला हात देत काढून घेतला़ त्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात 60 टक्के आणि नंतर तुडूंब भरलेल्या या प्रकल्पातून पाणी थेट शिवारात आलं़ गावच्या पाणी योजनेची भूजल पातळी दीड मीटर्पयत वाढली़ यामुळे दुष्काळ पडलाच तरीही ठाणेपाडा गावाला 10 वर्षे पुरेल एवढे पाणी गाव विहिरीतून देता येणे शक्य झाले आह़े जलयुक्तीद्वारे सुरू झालेला  लोकसहभागाचा लोकविचार आजही गावात कायम आह़े यामुळे का होईना, पाणीदार गावावरच न थांबता येत्या काळात ठाणेपाडा गाव वनपर्यटनासाठी तयार करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आला आह़े वॉटर व्हिलेज निर्माण करण्याचा संकल्प गावात गेल्या 2 वर्षात नाल खोलीकरण, सिमेंट बांध दुरुस्ती, माती बांध दुरुस्ती, नवीन साठवण बंधारा, विहीर पुनर्भरण, सीसीटी, मजगी, पाणी पिकाऊ खड्डे यांची निर्मिती करण्यात आली होती़ यात पाणी ङिारपत जाऊन शिवारातील पाण्याची पातळी वाढत गेली़ भूजल सव्रेक्षण विभागाने रिचार्ज स्ट्रेंज आणि रिचार्ज शाफ्ट या जलपुनर्भरणाच्या दोन पद्धती येथे राबवल्या होत्या़ यातून विहिरींचे पाणी हे 10 फूटांवर आले आह़े शेतात पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून शेतकरी ठिबक सिंचनावर भर देत आहेत़ ठिबक सिंचनावर कांदा पिकवणारे ठाणेपाडा हे बहुदा नंदुरबार जिल्ह्यातील पहिले गाव असाव़े आजघडीस ग्रामसेवक विजय होंडगर आणि सरपंच भारती देवमन पवार यांच्या संकल्पाने वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांचा समावेश आह़े यात लोकसहभागातून दगडी बांध आणि मातीबांध बांधकामाचा आराखडा तयार आह़े लवकरच या कामांना सुरुवात होणार आह़े ग्रामसेवक विजय होंडगर यांच्यासोबत संवाद साधला असता, त्यांनी ग्लोबल किंवा आयडीयल व्हिलेज ऐवजी वॉटर व्हिलेज असाच संकल्प आता करण्याची गरज आह़े कारण जल है तो कल है असे सांगितल़े