शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ ...

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये गाव हागणदारीमुक्त घोषित करणे या उपक्रमात गावचा हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा दर्जा कायम ठेवून त्यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस हा उपक्रम राबवून १५ ऑगस्टअखेर जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायती ९४५ गावे टप्प्याटप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करावयाच्या आहेत. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी विविध समाज माध्यमांद्वारे जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्याच्या विविध ग्रामपंचायतींत स्वच्छतेचा संदेश देणारा चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे. स्वच्छतेविषयी ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वच्छग्रहींना गौरविण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित स्वच्छतेविषयक चर्चासत्रात जिल्ह्यातील काही सरपंचांना सहभागी होता येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वच्छता संवाद या उपक्रमांतर्गत वर्षभरात जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत स्वच्छता संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त शाश्वत स्वच्छता या विषयावर दृक-श्राव्य माध्यमाद्वारे गावातील पदाधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी संकल्प शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजूषा हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.