शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लस हेच रोगावरील प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले आहे, हे आजवरचे उदाहरण आहे. कोरोनाबाबतही आपल्या शास्त्रज्ञांनी अतिशय कमी वेळात लस तयार केली आहे. त्यासंदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. लसीकरणामुळे स्वार्थाबरोबर परमार्थही साधता येतो. आपण तर स्वस्थ व्हाल व त्यातून समाजालाही सुरक्षित ठेवण्यात आपला वाटा राहणार आहे, असे राष्ट्रीय लसीकरण जागृती समितीचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डॉ.जयंत शाह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रश्न : कोरोनावरील लस १०० टक्के सुरक्षित आहे का?

जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचा थोड्याफार फरकाने काही ना काही परिणाम आहेच. कोरोनावरील सध्या ज्या लसी तयार झाल्या आहेत त्या आपल्या शास्त्रज्ञांनी खूप मेहनतीने व कमी वेळेत तयार केल्या आहेत. जंतूवर प्रक्रिया करून लस तयार केली जाते. ही लस जेव्हा शरीरात दिली जाते तेव्हा ती शरीरातील पेशींना जेव्हा संबंधित रोगाचे जंतू शरीरात आल्यास त्याला कसे प्रतिकार करायचे याबाबत काम करीत असतात. त्यामुळे लस दिल्यानंतर शरीरात काही ना काही बदल झाल्यामुळे प्राथमिक काही प्रतिक्रिया एखाद्या वेळेस दिसतात. त्यात किरकोळ ताप येणे, अंगदुखी असे प्रकार पण हे साध्या औषधीनेदेखील तात्काळ घालविता येतात. मात्र हीच लस आपल्याला गंभीर आजार व मृत्यूपासून वाचविते. केवळ आपणच त्यातून सुरक्षित होत नाही, तर आपल्यापासून इतरांनाही सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे ज्या अफवा आहे, जे गैरसमज आहे ते ते दूर केले पाहिजे व सर्वांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाला पूर्णपणे रोखायचे असेल तर लस हेच महत्त्वाचे हत्यार आहे.