शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

लस हेच रोगावरील प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले आहे, हे आजवरचे उदाहरण आहे. कोरोनाबाबतही आपल्या शास्त्रज्ञांनी अतिशय कमी वेळात लस तयार केली आहे. त्यासंदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. लसीकरणामुळे स्वार्थाबरोबर परमार्थही साधता येतो. आपण तर स्वस्थ व्हाल व त्यातून समाजालाही सुरक्षित ठेवण्यात आपला वाटा राहणार आहे, असे राष्ट्रीय लसीकरण जागृती समितीचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डॉ.जयंत शाह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रश्न : कोरोनावरील लस १०० टक्के सुरक्षित आहे का?

जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचा थोड्याफार फरकाने काही ना काही परिणाम आहेच. कोरोनावरील सध्या ज्या लसी तयार झाल्या आहेत त्या आपल्या शास्त्रज्ञांनी खूप मेहनतीने व कमी वेळेत तयार केल्या आहेत. जंतूवर प्रक्रिया करून लस तयार केली जाते. ही लस जेव्हा शरीरात दिली जाते तेव्हा ती शरीरातील पेशींना जेव्हा संबंधित रोगाचे जंतू शरीरात आल्यास त्याला कसे प्रतिकार करायचे याबाबत काम करीत असतात. त्यामुळे लस दिल्यानंतर शरीरात काही ना काही बदल झाल्यामुळे प्राथमिक काही प्रतिक्रिया एखाद्या वेळेस दिसतात. त्यात किरकोळ ताप येणे, अंगदुखी असे प्रकार पण हे साध्या औषधीनेदेखील तात्काळ घालविता येतात. मात्र हीच लस आपल्याला गंभीर आजार व मृत्यूपासून वाचविते. केवळ आपणच त्यातून सुरक्षित होत नाही, तर आपल्यापासून इतरांनाही सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे ज्या अफवा आहे, जे गैरसमज आहे ते ते दूर केले पाहिजे व सर्वांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाला पूर्णपणे रोखायचे असेल तर लस हेच महत्त्वाचे हत्यार आहे.