शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतर ट्रॅव्हल्स व्यवसायाला आले ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

नंदुरबार : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी यंत्रणा मूळपदावर येत आहे. तर ...

नंदुरबार : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी यंत्रणा मूळपदावर येत आहे. तर दुसरीकडे खासगी वाहतूक व्यवसाय पुन्हा तेजीत आला असून नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे धावणारी ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल गर्दीत मार्गी लागत असल्याचे दिलासादायक दृश्य दिसून आले आहे.

एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याला ऐतिहासिक असे बदल पहावयाला मिळाले. यात रेल्वे व बसव्यवस्था पूर्णपणे बंद होऊन प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. कालांतराने खासगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्यानंतर मार्च २०२१ पासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट फोफावत गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली होती. गत दीड वर्षांत दोन वेळा झालेले लाॅकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे नागरिकांनी स्वत:च्या वाहनाने प्रवास करणे पसंत केले होते. यातून वर्षभर खच्चून गर्दी ओढणाऱ्या ट्रॅव्हल्स प्रथमच रिकाम्या धावू लागल्याचे दिसून आले होते. यातून गेल्या महिन्यात रक्षाबंधनाने ट्रॅव्हल्सला बूस्टर दिला होता. हाच बूस्टर कायम असून गणेशोत्सवाने ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांना दिलासा मिळाला आहे. यातून बंद पडलेले व्यवसाय सुरळीतपणे सुरु झाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे ही वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली असताना, दुसरीकडे खासगी चारचाकी वाहनचालकांनाही गर्दी मिळू लागल्याचे दिसून आले आहे. यातून त्यांच्या रोजगारालाही गती मिळाली आहे.

नंदुरबार ते पुणे आणि मुंबई मार्गावर सर्वाधिक गाड्या सुटत आहेत. डिझेलची दरवाढ तसेच चालक आणि वाहकांचे वेतन वाढले आहे. यामुळे दरांमध्ये काहीअंशी दरवाढ आहे. इंधन दर कमी झाल्यास या दरांमध्येही कपात करण्याचे नियोजन आहे.

-तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्सचालक,

खासगी वाहने व मिनिबस भाडेही वाढले आहे. डिझेल रेट वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या पर्यटनासाठी जाणारे उत्साह दाखवत आहेत. यामुळे मिनी बसच्या बुकिंग जोरात सुरू आहेत. यातून या व्यवसायावरील अवकळा दूर होत आहे.

-जितेंद्र सोनार, वाहतूक व्यावसायिक,

वर्दी......... मिळू लागली

एकीकडे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय गती पकडत असताना खासगी वाहन चालकांनाही प्रवासी मिळत आहेत. सध्या पर्यटनासाठी जाणारे प्रवासी मिळत असून येत्या काळात सणासुदीनिमित्त जिल्ह्यात येणारे व बाहेर जाणारे प्रवासी मिळून व्यवसाय सुरू राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुलांना गणेशोत्सवात घरी यायचे असल्याने ट्रॅव्हल्सचे बुकिंग गेले होते. सुटीमुळे त्यांना घरी येता आले. वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याने होणारे हाल थांबले आहेत. ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

-अविनाश पाटील, नंदुरबार.

भाडेवाढ झाली असली तरी पुण्याकडून येणाऱ्यांची अडचण दूर झाली आहे. सर्वच ठिकाणी जादा पैसे मोजावे लागत आहेत. परंतु प्रवास सुखकर आणि उपाययोजनांसह होणे गरजेचा आहे.

-शशिकांत पाटील, नंदुरबार.