शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

अज्ञात माथेफिरूने कापली पपईची दोन हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांनी यंदा पपईची लागवड केली होती. मंगळवारी ...

बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांनी यंदा पपईची लागवड केली होती. मंगळवारी सकाळी ते मजुरांसह शेतात गेले असता, परिपक्व होत आलेल्या पपईच्या झाडांची धारदार शस्त्राच्या साहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले. अज्ञाताकडून सुमारे १ हजार ७०० झाडे कापल्याचे मोजणीतून समोर आले. दरम्यान, दहा दिवसांपूर्वीदेखील याच शेतकऱ्याची पपईची ५० झाडे अज्ञात व्यक्तीने कापली होती. तीन एकरातील पपईसाठी शेतकरी दत्तू पाटील यांनी ७५ हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला होता. हा खर्च वाया गेल्याने समस्या निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यातही बोरद येथील जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या करणखेडा रस्त्याला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाचीसुद्धा नासधूस करण्यात आली होती. बोरद पोलीस दूरक्षेत्रात एकाच महिन्यात तिसरी घटना घडल्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

मंगळवारी रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शेतात कुणीही नसल्याच्या अंदाज घेत कृत्य केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कापण्यात आलेली सर्व झाडे ही अर्ध्यातून मोडल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश खोंडे, छोटू कोळी, रामोळे, सचिन अहिरे यांनी शेतात पाहणी करून आढावा घेतला.

एप्रिल महिन्यात या पपईची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या पपईला बऱ्यापैकी फळ व फुलोरा आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न येणार असे दिसून येत होते. दरम्यान, असा प्रकार घडल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अज्ञातांनी हिरावून नेला असल्याचे बोलले जात आहे.

तीन एकर क्षेत्रात तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यात मागील आठवड्यात ५० च्या जवळपास पपईच्या झाडांची माथेफिरूने कत्तल केली आणि आता पुन्हा तब्बल दोन झाडांची कत्तल केल्याने पायाखालची जमीनच सरकली. मागील आठवड्यात तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची माहिती शेतकरी दत्तू पाटील यांनी दिली.

दरम्यान, बोरद शिवारात अज्ञात माथेफिरू कडून झाडे कापली जाण्याचे घडणारे प्रकारे हे गंभीर आहेत. अज्ञात व्यक्तीला शोधून कठोर कारवाई करणार आहे. बोरद शिवारात रात्रीची गस्त सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी सांगितले.