शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नवापूरात दोन लाख पक्ष्यांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST

बर्ड फ्लूचा धोका माणसात होणार नाही बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण ...

बर्ड फ्लूचा धोका माणसात होणार नाही

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आतापर्यंत प्राण्यांमधून माणसे बाधित होण्याची जगातील संख्या ही ८६२ असून त्यामुळे ४५५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात मात्र पक्ष्यांमधून माणसात हा आजार जडण्याचे प्रमाण तसे नसल्याचे दिसून आले आहे. ७० अंशापेक्षा अधिक तापमानात चिकन, अंडी उकळल्यास ते सुरक्षित होत असल्याने भारतात बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तरी देखील नवापूरमधील पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेशी निगडित कर्मचारी आणि कुक्कुटपालन केंद्रातील कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून टॅमी फ्लूचा डोज दिला जात आहे. पक्ष्यांची संख्या मोठी असल्याने ते नष्ट करण्याच्या प्रक्रियेला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

डॉ. राजेंद्र भरूड, जिल्हाधिकारी

तिसऱ्या दिवशी ९१ पथक नियुक्त

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू नवापूरात सुरू झाले आहे. तिसऱ्या दिवसासाठी नवापूर शहरात नाशिक विभागातील जळगाव १६, नाशिक २७,अहमदनगर ३६ तर नंदुरबार येथील १२ असे ९१ पथक कार्यरत झाले आहे. एका पथकात १ पशुधन विकास अधिकरी,१ पशुधन पर्यवेक्षक, २ परिचर,असे पाच असे एकूण ३८९ कर्मचारी किलिंग ऑपरेशनात सहभागी झाले आहे. सोबतच ९५ पशुधन विकास अधिकारी आहेत.

किलिंग ऑपरेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास

किलिंग मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून घामाने मोठा त्रास होत असल्याने व अनेक कर्मचाऱ्यांना उलटी झाल्याची समस्या जाणवत आहे. आमलीवाला पोल्ट्रीतील चार कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याने तात्काळ उपचार करण्यात आला.त्यासाठी सर्व पोल्ट्रीमध्ये आरोग्य पथकाचे डाॅक्टर नर्स अशी टिम कार्यरत आहे.

नाशिक महानगरपालिकेतील यंत्र दाखल

नवापूरातील बर्ड फ्ल्यू मोहिमेत नाशिक महानगरपालिकेचे यंत्रणा व साधन सामग्री मागवण्यात आली आहे.सदर यंत्रणा तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांची विष्ठा काढण्यासाठी काम करणार आहे.

तीन ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था

नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी नवापुरात दाखल झाले आहे. त्यांची निवासाची व्यवसाय तीन ठिकाणी करण्यात आली आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचारी निवासात तर देवळफळी भागातील शासकीय मुलांचे वसतिगृहात तर उर्वरितांची सिनियर काॅलेजच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे.