शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

बिनविरोधचा ट्रेण्ड पडतोय राजकीय पक्षांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:47 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, ...

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, राजकीय वैमनस्य नको, एकी साधून गाव विकास होत असेल तर त्याला पाठींबा देणे आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक बचत करणे हा उद्देश यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. दुसरी बाब म्हणजे थेट सरपंच निवड रद्द होणे आणि सरपंचपदाचे आरक्षण न निघणे शिवाय नेत्यांच्या दृष्टीने पुढील काळात कुठलीही सार्वजनिक निवडणूक नसणे अर्थात कार्यकर्ते सांभाळण्याचे सद्यातरी टेन्शन नसणे ही कारणे देखील  ‘बिनविरोध’ ट्रेंडला चालना देणारे ठरत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी शनिमांडळ ग्रामपंचायत सामोपचाराने बिनविरोध होणे आणि तीच पार्श्वभूमी असलेली खोंडामाळी ग्रामपंचायत देवीच्या मंदीराच्या बांधकामाच्या माध्यमातून बिनविरोध होणे हे राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही समाधानाची बाब ठरली आहे. नंदुरबार तालुक्यताील २२ ग्रामपंचायीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच ग्रामपंचायती या पूर्व भागातील अर्थात नंदुरबार मतदारसंघातील आहेत. नंदुरबार तालुक्याचा पश्चीम भाग नवापूर मतदारसंघात येतो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायतींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जाते. पूर्व भागातील ग्रामपंचायती या  विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.अर्ज छाननीनंतर ७० टक्के चित्र स्पष्ट झाले आहे. आता सोमवार, ४रोजी माघारीच्या अंतीम क्षणानंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे. २२ ग्रामपंचायतींमध्ये शनिमांडळ, खोंडामळी, भालेर, कोपर्ली, न्याहली, वैंदाणे ही काही गावे नेत्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जातात. प्रशासन दप्तरी देखील यातील काही ग्रामपंचायतींची राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून नोंद आहे. अशा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय दृष्ट्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. परंतु येत्या काळात कुठलीच सार्वजनिक निवडणूक नसल्याचे पहाता नेत्यांनीही सर्वच कार्यकर्त्यांना सामोपचाराने घेण्याचे आवाहन केले. खोंडामळी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी देवीच्या मंदीर बांधण्याचा निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आणि त्यांना यशही आले. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शनिमांडळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत देखील सामंजस्य आणि एकीचे चित्र दिसले. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे समान सदस्य घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. शनिमांडळला लागूनच असलेल्या तिलाली ग्रामपंचायतीतही हा प्रयोग यशस्वी झाला. निंबेलही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सिंदगव्हाणही त्याच मार्गावर आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतीत सरळ निवडणूक लढत रंगणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तालुक्यातील ज्या घटनेतील तरतुदीनुसार ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत १५ लाखाचा निधी विकास कामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाही परिणाम सकारात्मक होणार आहे.एकुणच नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या म्हणजे  म्हणजे मोठी चुरस राहत होती. नेते देखील आपल्या कार्यर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकांमध्ये रस घेत होते. परंतु यंदा निवडणुकांचे बदलले नियम, सरपंच पदाच्या आरक्षणाची अनिश्चीतता आणि थेट सरपंचपदाची बाद झालेली पद्धत यामुळे या निवडणुकांमध्ये फारशी राजकीय रस्सीखेच नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. केवळ स्थानिक प्रश्न आणि गावगाड्यातील राजकारण याच भोवती काही गावांच्या निवडणुका रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.