शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

बिनविरोधचा ट्रेण्ड पडतोय राजकीय पक्षांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:47 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, ...

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, राजकीय वैमनस्य नको, एकी साधून गाव विकास होत असेल तर त्याला पाठींबा देणे आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक बचत करणे हा उद्देश यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. दुसरी बाब म्हणजे थेट सरपंच निवड रद्द होणे आणि सरपंचपदाचे आरक्षण न निघणे शिवाय नेत्यांच्या दृष्टीने पुढील काळात कुठलीही सार्वजनिक निवडणूक नसणे अर्थात कार्यकर्ते सांभाळण्याचे सद्यातरी टेन्शन नसणे ही कारणे देखील  ‘बिनविरोध’ ट्रेंडला चालना देणारे ठरत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी शनिमांडळ ग्रामपंचायत सामोपचाराने बिनविरोध होणे आणि तीच पार्श्वभूमी असलेली खोंडामाळी ग्रामपंचायत देवीच्या मंदीराच्या बांधकामाच्या माध्यमातून बिनविरोध होणे हे राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही समाधानाची बाब ठरली आहे. नंदुरबार तालुक्यताील २२ ग्रामपंचायीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच ग्रामपंचायती या पूर्व भागातील अर्थात नंदुरबार मतदारसंघातील आहेत. नंदुरबार तालुक्याचा पश्चीम भाग नवापूर मतदारसंघात येतो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायतींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जाते. पूर्व भागातील ग्रामपंचायती या  विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.अर्ज छाननीनंतर ७० टक्के चित्र स्पष्ट झाले आहे. आता सोमवार, ४रोजी माघारीच्या अंतीम क्षणानंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे. २२ ग्रामपंचायतींमध्ये शनिमांडळ, खोंडामळी, भालेर, कोपर्ली, न्याहली, वैंदाणे ही काही गावे नेत्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जातात. प्रशासन दप्तरी देखील यातील काही ग्रामपंचायतींची राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून नोंद आहे. अशा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय दृष्ट्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. परंतु येत्या काळात कुठलीच सार्वजनिक निवडणूक नसल्याचे पहाता नेत्यांनीही सर्वच कार्यकर्त्यांना सामोपचाराने घेण्याचे आवाहन केले. खोंडामळी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी देवीच्या मंदीर बांधण्याचा निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आणि त्यांना यशही आले. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शनिमांडळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत देखील सामंजस्य आणि एकीचे चित्र दिसले. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे समान सदस्य घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. शनिमांडळला लागूनच असलेल्या तिलाली ग्रामपंचायतीतही हा प्रयोग यशस्वी झाला. निंबेलही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सिंदगव्हाणही त्याच मार्गावर आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतीत सरळ निवडणूक लढत रंगणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तालुक्यातील ज्या घटनेतील तरतुदीनुसार ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत १५ लाखाचा निधी विकास कामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाही परिणाम सकारात्मक होणार आहे.एकुणच नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या म्हणजे  म्हणजे मोठी चुरस राहत होती. नेते देखील आपल्या कार्यर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकांमध्ये रस घेत होते. परंतु यंदा निवडणुकांचे बदलले नियम, सरपंच पदाच्या आरक्षणाची अनिश्चीतता आणि थेट सरपंचपदाची बाद झालेली पद्धत यामुळे या निवडणुकांमध्ये फारशी राजकीय रस्सीखेच नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. केवळ स्थानिक प्रश्न आणि गावगाड्यातील राजकारण याच भोवती काही गावांच्या निवडणुका रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.