शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बिनविरोधचा ट्रेण्ड पडतोय राजकीय पक्षांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:47 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, ...

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, राजकीय वैमनस्य नको, एकी साधून गाव विकास होत असेल तर त्याला पाठींबा देणे आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक बचत करणे हा उद्देश यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. दुसरी बाब म्हणजे थेट सरपंच निवड रद्द होणे आणि सरपंचपदाचे आरक्षण न निघणे शिवाय नेत्यांच्या दृष्टीने पुढील काळात कुठलीही सार्वजनिक निवडणूक नसणे अर्थात कार्यकर्ते सांभाळण्याचे सद्यातरी टेन्शन नसणे ही कारणे देखील  ‘बिनविरोध’ ट्रेंडला चालना देणारे ठरत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी शनिमांडळ ग्रामपंचायत सामोपचाराने बिनविरोध होणे आणि तीच पार्श्वभूमी असलेली खोंडामाळी ग्रामपंचायत देवीच्या मंदीराच्या बांधकामाच्या माध्यमातून बिनविरोध होणे हे राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही समाधानाची बाब ठरली आहे. नंदुरबार तालुक्यताील २२ ग्रामपंचायीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच ग्रामपंचायती या पूर्व भागातील अर्थात नंदुरबार मतदारसंघातील आहेत. नंदुरबार तालुक्याचा पश्चीम भाग नवापूर मतदारसंघात येतो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायतींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जाते. पूर्व भागातील ग्रामपंचायती या  विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.अर्ज छाननीनंतर ७० टक्के चित्र स्पष्ट झाले आहे. आता सोमवार, ४रोजी माघारीच्या अंतीम क्षणानंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे. २२ ग्रामपंचायतींमध्ये शनिमांडळ, खोंडामळी, भालेर, कोपर्ली, न्याहली, वैंदाणे ही काही गावे नेत्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जातात. प्रशासन दप्तरी देखील यातील काही ग्रामपंचायतींची राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून नोंद आहे. अशा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय दृष्ट्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. परंतु येत्या काळात कुठलीच सार्वजनिक निवडणूक नसल्याचे पहाता नेत्यांनीही सर्वच कार्यकर्त्यांना सामोपचाराने घेण्याचे आवाहन केले. खोंडामळी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी देवीच्या मंदीर बांधण्याचा निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आणि त्यांना यशही आले. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शनिमांडळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत देखील सामंजस्य आणि एकीचे चित्र दिसले. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे समान सदस्य घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. शनिमांडळला लागूनच असलेल्या तिलाली ग्रामपंचायतीतही हा प्रयोग यशस्वी झाला. निंबेलही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सिंदगव्हाणही त्याच मार्गावर आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतीत सरळ निवडणूक लढत रंगणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तालुक्यातील ज्या घटनेतील तरतुदीनुसार ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत १५ लाखाचा निधी विकास कामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाही परिणाम सकारात्मक होणार आहे.एकुणच नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या म्हणजे  म्हणजे मोठी चुरस राहत होती. नेते देखील आपल्या कार्यर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकांमध्ये रस घेत होते. परंतु यंदा निवडणुकांचे बदलले नियम, सरपंच पदाच्या आरक्षणाची अनिश्चीतता आणि थेट सरपंचपदाची बाद झालेली पद्धत यामुळे या निवडणुकांमध्ये फारशी राजकीय रस्सीखेच नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. केवळ स्थानिक प्रश्न आणि गावगाड्यातील राजकारण याच भोवती काही गावांच्या निवडणुका रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.