शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पारंपरिक पद्धतीने जात्यावर डाळ तयार करण्याची पद्धत आजही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

ब्राह्मणपुरी : जात्यावर दळण दळीते, सुपात गोंधळ घालीत अशी पारंपरिक जात्यावरील गीते आता सध्या २१ व्या शतकात लुप्त होऊ ...

ब्राह्मणपुरी : जात्यावर दळण दळीते, सुपात गोंधळ घालीत अशी पारंपरिक जात्यावरील गीते आता सध्या २१ व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही. इतकेच नव्हे तर शहरी भागातदेखील जात्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात आजही दिसून येत आहे.

पूर्वीचा काळ वेगळा होता. विद्युतीकरण कुठेच नव्हते. यातच ग्रामीण भागात शेत शिवारातून निघालेले धान्य जात्यावर दळून कसदार अन्न पूर्वीच्या लोकांना मिळत होते आणि त्या वेळेची पिढी सुदृढ आणि सक्षम असायची, असे इतिहास बोलतो. खरे तर पूर्वीच्या काळात जात्यावरच्या डाळी, दळण या ग्रामीण महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. आजच्या सोशल मीडियाच्या या काळात खेड्यापाड्यात असणारी जाती व जात्यावरील डाळ भरडणे काही प्रमाणात ग्रामीण भागातून कालबाह्य झाले आहे. मात्र शहादा तालुक्यात ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न वयोवृद्ध महिला जात्यावर डाळ भरडून करीत आहेत.

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या, सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची. त्याची गोडी होती. म्हणूनच बहिणाबाईंची गाणी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आजही आपण गुणगुणल्याशिवाय राहत नाही.

असे आहे जाते

कडधान्य दळून त्याची डाळ तसेच बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्यामध्ये एक छिद्र असते त्यातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्या एकमेकांवर घासून कडधान्याचे डाळीबरोबरच पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.