शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या तिन्ही धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे हतनूर धरणाचे दरवाजे देखील उघडल्याने तापीही दुथडीभरून वाहत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.     जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवण, रंगावली, सुसरी व गोमाई नद्यांना पाणी आले आहे. आधीच या नद्यांवरील धरणांमध्ये पाणीसाठा पुर्णक्षमतेने झाला आहे. आता पुन्हा पाऊस सुरू असल्याने व नदीतून पाण्याची आवक सुरू असल्याने पाणी लेव्हल कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विरचकचे तीन दरवाजे उघडलेविरचक धरणात पाण्याची आवक सुरूच असून यामुळे विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 750 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जोर्पयत नदीपात्रातून पाण्याची आवक सुरू राहील त्या प्रमाणात हे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बागुल यांनी दिली. धरणात सद्य स्थितीत 93 टक्के पाणीसाठा आहे. अजून परतीचा पाऊस बाकी असल्यामुळे धरण यंदा 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न किमान दोन वर्ष मिटला आहे. शिवण नदीला पाणी आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोमाईलाही पूरसुसरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोमाई नदीला पूर आला आहे. नदी काठावरील लोणखेडा, उंटावद, मलोणी, शहादा, पिंगाणे, लांबोळा, डामरखेडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रंगावलीचेही दरवाजे उघडलेरंगावली प्रकल्पाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. यामुळे या नदीलाही पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नवापूरातील नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजहतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापीला पाणी आले आहे. परिणामी सारंगखेडा बॅरेजचे चार तर प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. 

सततचा पावसामुळे पिकं खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे शेतांमध्ये अंतरमशागतीच्या कामांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतात तण वाढले आहे. खतांच्या आणि किटकनाशकांच्या मात्रा देण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. सतत असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकं पिवळी पडून त्यांची उत्पादकता कमी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी काढणार तर कुठे हा प्रश्न आहे. कारण शेतालगतचे नाले, विहिरी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांना त्याचा फटका बसत आहे. परिणामी शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.