शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या तिन्ही धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे हतनूर धरणाचे दरवाजे देखील उघडल्याने तापीही दुथडीभरून वाहत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.     जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवण, रंगावली, सुसरी व गोमाई नद्यांना पाणी आले आहे. आधीच या नद्यांवरील धरणांमध्ये पाणीसाठा पुर्णक्षमतेने झाला आहे. आता पुन्हा पाऊस सुरू असल्याने व नदीतून पाण्याची आवक सुरू असल्याने पाणी लेव्हल कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विरचकचे तीन दरवाजे उघडलेविरचक धरणात पाण्याची आवक सुरूच असून यामुळे विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 750 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जोर्पयत नदीपात्रातून पाण्याची आवक सुरू राहील त्या प्रमाणात हे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बागुल यांनी दिली. धरणात सद्य स्थितीत 93 टक्के पाणीसाठा आहे. अजून परतीचा पाऊस बाकी असल्यामुळे धरण यंदा 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न किमान दोन वर्ष मिटला आहे. शिवण नदीला पाणी आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोमाईलाही पूरसुसरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोमाई नदीला पूर आला आहे. नदी काठावरील लोणखेडा, उंटावद, मलोणी, शहादा, पिंगाणे, लांबोळा, डामरखेडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रंगावलीचेही दरवाजे उघडलेरंगावली प्रकल्पाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. यामुळे या नदीलाही पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नवापूरातील नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजहतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापीला पाणी आले आहे. परिणामी सारंगखेडा बॅरेजचे चार तर प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. 

सततचा पावसामुळे पिकं खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे शेतांमध्ये अंतरमशागतीच्या कामांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतात तण वाढले आहे. खतांच्या आणि किटकनाशकांच्या मात्रा देण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. सतत असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकं पिवळी पडून त्यांची उत्पादकता कमी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी काढणार तर कुठे हा प्रश्न आहे. कारण शेतालगतचे नाले, विहिरी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांना त्याचा फटका बसत आहे. परिणामी शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.