शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या तिन्ही धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे हतनूर धरणाचे दरवाजे देखील उघडल्याने तापीही दुथडीभरून वाहत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.     जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवण, रंगावली, सुसरी व गोमाई नद्यांना पाणी आले आहे. आधीच या नद्यांवरील धरणांमध्ये पाणीसाठा पुर्णक्षमतेने झाला आहे. आता पुन्हा पाऊस सुरू असल्याने व नदीतून पाण्याची आवक सुरू असल्याने पाणी लेव्हल कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विरचकचे तीन दरवाजे उघडलेविरचक धरणात पाण्याची आवक सुरूच असून यामुळे विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 750 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जोर्पयत नदीपात्रातून पाण्याची आवक सुरू राहील त्या प्रमाणात हे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बागुल यांनी दिली. धरणात सद्य स्थितीत 93 टक्के पाणीसाठा आहे. अजून परतीचा पाऊस बाकी असल्यामुळे धरण यंदा 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न किमान दोन वर्ष मिटला आहे. शिवण नदीला पाणी आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोमाईलाही पूरसुसरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोमाई नदीला पूर आला आहे. नदी काठावरील लोणखेडा, उंटावद, मलोणी, शहादा, पिंगाणे, लांबोळा, डामरखेडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रंगावलीचेही दरवाजे उघडलेरंगावली प्रकल्पाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. यामुळे या नदीलाही पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नवापूरातील नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजहतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापीला पाणी आले आहे. परिणामी सारंगखेडा बॅरेजचे चार तर प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. 

सततचा पावसामुळे पिकं खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे शेतांमध्ये अंतरमशागतीच्या कामांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतात तण वाढले आहे. खतांच्या आणि किटकनाशकांच्या मात्रा देण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. सतत असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकं पिवळी पडून त्यांची उत्पादकता कमी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी काढणार तर कुठे हा प्रश्न आहे. कारण शेतालगतचे नाले, विहिरी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांना त्याचा फटका बसत आहे. परिणामी शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.