शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

तळोद्यात तीन दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेजारच्या शहादा व अक्कलकुवा तालुक्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय प्रशासनाने बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेजारच्या शहादा व अक्कलकुवा तालुक्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय प्रशासनाने बुधवारी दुपार ते शुक्रवार मध्यरात्री यादरम्यान तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे़ केवळी औषधी विक्रेते, दवाखाने आणि शासकीय गोदामे यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे़दोन दिवसांपूर्वीच शासनाने लॉकडाऊनची स्थिती शिथिल केली होती़ त्यामुळे तळोदावासियांना दिलासा मिळाला होता़ मात्र आता पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन रहावे लागणार आहे़ तळोदा तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णही आढळून आलेला नाही़ परंतू मंगळवारी शेजारील शहादा व अक्कलकुवा तालुक्यात तीन रुग्ण आढळून आल्यानंतर तळोदावासियांची चिंता वाढली आहे़ प्रशासनाकडूनही प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना अवलंबल्या जात आहे़ खबरदारी म्हणून उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून संचारबंदी सुरु करण्यात आली आहे़ संचारबंदीतून दवाखाने, मेडीकल, गोदामे यांना सूट देण्यात आली आहे़ बुधवारी दुपारी शहरात प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी भेटी देत पाहणी केली़दरम्यान अक्कलकुवा येथील पॉझिटिव्ह महिला रुग्ण शहरातील एका शाळेत कार्यरत असल्याची माहिती आहे़ यांतर्गत त्यांच्या उपस्थितीत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते़ यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने शहरात सर्वेक्षण हाती घेतले आहे़ यांतर्गत बागवान गल्लीत सर्वेक्षण करण्यात आले़ महिला रुग्णाने भेटी दिलेल्या शाळेसह आरोग्य पथकाने बागवान गल्ली, एकतानगर, नुराणी चौकातील नागरिकांच्या घरी जावून आरोग्य पथकाने सर्वेक्षण करुन तपासणी केली़ एकूण ४७ कुटूंबांची तपासणी करण्यात आली असून यातील कोणालाही सर्दी,खोकला, ताप किंवा इतर तत्सम लक्षणे दिसून आलेली नाहीत़ आरोग्य विभाग या भागावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे़

नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी बसस्थानकात शहरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांची सोय करण्यात आली होती़ परंतू येथे अंकुश ठेवण्यात प्रशासनाला यश मात्र आले नव्हते़ या पार्श्वभूमीवर तळोदा तालुका कृषी विभागाकडून घरपोच भाजीपाला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी अष्टविनायक शेतकरी गटांतर्गत घरपोच भाजीपाला देण्यावर भर देण्यात येणार आहे़ शहरातील विविध वसाहतींमध्ये घरपोच भाजीपाला दिला जात आहे़ या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहेत़