शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

तापमान वाढले, पावसाचे दिवस कमी झाले तर भूकंपाचे धक्के वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने त्याचा पर्यावरणावरदेखील परिणाम होत आहे. पावसाचे दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : सातपुड्यातील जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने त्याचा पर्यावरणावरदेखील परिणाम होत आहे. पावसाचे दिवस कमी झाले असून, तापमानात किमान ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सरदार सरोवरसारख्या महाकाय जलप्रकल्पामुळे सातपुड्यातील भूगर्भातील संरचना कमालीची बदलत असून, भूकंपाचे धक्केदेखील वाढले आहेत.

दरम्यान यू. के. मेट ऑफिस व द एनर्जी रिसोर्स संस्था यांनी रिजन क्लायमेट मॅाडेलिंग सिस्टीमनुसार येत्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वातावरणीय बदल होणार असल्याचा इशारा दिलेला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याने आतापासूनच सतर्क झाले पाहिजे.

जिल्ह्यातील जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, त्याचा वातावरणीय परिणाम जाणवू लागला आहे. त्यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वी सातपुड्यात घनदाट जंगल होते. त्यामुळे जैवविविधतादेखील मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर मात्र जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट झाले. आजच्या स्थितीत सातपुड्यात २० टक्केही जंगल उरलेले नाही. त्याचा परिणाम पावसाचे दिवस कमी होणे, तापमानात वाढ होणे असे जाणवू लागले आहेत.

पावसाचे दिवस १४ ते १७ दिवसांनी कमी

वातावरणीय बदलामुळे पावसाचे दिवस कमी झाले आहेत. सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यासह शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी सरासरी ८५ ते १०० टक्के पाऊस पडत होता. ती सरासरी आता ५ ते १० टक्क्यांनी कमी झाली आहे. पावसाचे दिवस जिल्ह्यात पूर्वी सरासरी ६५ ते ७० दिवस होते, ते आता ५० ते ६० दरम्यान आले आहेत. सर्वच भागात एकसमान पावसाची स्थिती आता राहिली नसून एकाच तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पावसाची सरासरी येऊ लागली आहे. गेल्या १५ वर्षांत दोन वर्षे वगळता एकाही वर्षी पावसाने सरासरी गाठलेली नाही, हा चिंतेचा विषय आहे.

तापमानातही वाढ

जंगलतोड, पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे तापमानातही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. पूर्वी ३४ ते ३७ सेल्सिअसपर्यंत राहणारे तापमान आजच्या स्थितीत ३९ ते ४२ अंशावर पोहोचले आहे. मध्य प्रदेश, गुजरात भागाकडून वाहणारे उष्ण वारे पूर्वी सातपुड्यातील जंगलांमुळे अडविले जाऊन त्याची तीव्रता कमी राहत होती. आता सातपुडाच बोडका झाल्याने उष्ण वारे थेट जिल्ह्याच्या सपाट भागातदेखील वाहू लागले आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. येत्या काळात तापमानाची सरासरी ४३ ते ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता यापूर्वीच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे.

भूकंपाचे धक्के वाढले

जिल्ह्याला लागून असलेल्या महाकाय सरदार सरोवर प्रकल्पामुळे सातपुड्यातील भूगर्भातील हालचाली वाढल्या आहेत. त्यांची संरचना बदलत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. सरदार सरोवर निगमच्या शहादा तालुक्यातील सावळदे भूकंप मापन केंद्रातील नोंदी तपासल्यास त्याला दुजोरा मिळू शकतो. त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या हीदेखील आणखी एक धोक्याची घंटा ठरू शकते.

जैवविविधता जपा

सातपुड्यात जैवविविधतेचा खजाना आहे. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीव सातपुड्याची ओळख आहे. फुलपाखरांच्या विविध जातींचा खजिना सातपुड्यात आहे. गोगलगाईंचे समृद्ध विश्व सातपुड्यात आहे. नामशेष होणारे दुर्मीळ पक्षी तोरणमाळच्या जंगलात आढळतात. ही जैवविविधता जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सामाजिक आणि पर्यावरणीय चळवळ उभी राहिली पाहिजे.