शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

शिक्षक सर्वस्पर्शी व धर्मनिरपेक्ष असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समाजातील काही शिक्षक व्यसनाधीनतेच्या आहारी गेले असल्याची खंत व्यक्त करीत, निर्भयता, धर्मनिरपेक्षता आणि परिपक्वता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समाजातील काही शिक्षक व्यसनाधीनतेच्या आहारी गेले असल्याची खंत व्यक्त करीत, निर्भयता, धर्मनिरपेक्षता आणि परिपक्वता सिद्ध करून शिक्षकांनी समाजापुढे यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली आहे.इंदिरा गांधी मंगल कार्यालयात जिल्हा शैक्षणिक संघटना समन्वय समितीच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी साहित्यिक सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी.एस. पाटील होते. या वेळी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.एन.डी नांद्रे यांच्या गौरव अंकाचे प्रकाशन साहित्यिक डॉ.सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.सबनीस म्हणाले, शिक्षक नेहमी निर्भय, संशोधक, सर्वस्पर्शी व धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीच्या असला पाहिजे. शिक्षकांनी त्यांच्यातली निर्भयता  व धर्मनिरपेक्षता परिपक्व असल्याचे सिद्ध करायला हवे. अनेक शिक्षक आज गैर मार्गाच्या वळणावर लागलेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्राचार्य डॉ.एन.डी नांद्रे यांना मानपत्र, शाल व पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सामूहिक सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा.एस.एन पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, सबनीस, द्वारकाबाई नांद्रे, नलिनी नांद्रे, माजी शिक्षक आमदार जयंतराव ठाकरे, माजी आमदार दिलीप सोनवणे, पीडीएफचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप बेडसे, ज्येष्ठ विधिज्ञ उत्तमराव मराठे, श्रीपत पटेल, पीडीएफचे जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी, विमा भामरे, बि.के नांद्रे, जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील, हिरालाल पगडाल, साहित्यिक प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, गजेंद्र भोसले, आर.एस. बाविस्कर, वेतन अधीक्षिका मीनाक्षी गिरी आदी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.नांद्रे यांनी सत्काराला ुउत्तर दिले. प्रास्ताविक श्रीपत पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र शिंदे व चेतना बिरारीस तर आभार प्रा.प्रभाकर नांद्रे यांनी मानले.