शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जिल्ह्यात कोरोनावर तातडीने उपाययोजना करा- भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

पालकमंत्री अ‍ॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. ...

पालकमंत्री अ‍ॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. प्रतिदिन १० ते १५ व्यक्ती मृत्युमुखी पडत असून, सरासरी २००० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. यात स्वॅब देऊन, सिटीस्कॅन करून व अ‍ॅन्टीजेन कीटचा समावेश आहे. अत्यंत भयावह अशी जिल्ह्याची परिस्थिती असून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. कधी नव्हे, अशी नरकयातना नागरिकांना भोगावी लागत आहे. यासाठी सर्वप्रथम मागेल त्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध करून द्यावे, जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे व रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, खासगी रुग्णालयांना सातत्याने रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे. मागेल त्या रुग्णालयांना कोविड रुग्णासाठी परवानगी द्यावी. ५ एम.डी. डॉक्टर, परिचारिका, स्टाफ यांची भरती करण्यात यावी, लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, चौकाचौकांत तसेच प्रत्येक प्रभागातील समाजमंदिर व शाळांचे वर्ग उपलब्ध करून लसीकरणाची मोहीम जोमाने करावी, लसीकरणाबाबत जनतेला जागृत करण्याकामी मोठ-मोठ्या फलकांद्वारे जनजागृती करावी, लसीकरण केंद्रावर एकाच वेळी १० लोकांची लस देण्यासंदर्भात सोय करावी, जेणेकरून लस वाया जाणार नाही, जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपलब्ध बेडची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात यावी, गेल्यावर्षीच्या कोरोनाकाळात केंद्र शासनाने ज्याप्रमाणे आर्थिक सवलती दिल्या होत्या त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी आर्थिक सवलती उपलब्ध करून द्याव्यात.