शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

सुसरी वळण रस्ता ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ट्रॉली उलटून अपघात झाल्यानी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघात वाढले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता होईल तेव्हा होईल निदान या मार्गावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.गेल्या तीन वर्षांपासून कोळदा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे सुरू असलेले काम संथगतीने होत असल्याने सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या तीन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यातच शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास याच मार्गावर कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी ठेकेदार व लोकप्रतिनिधींविरूध्द संताप व्यक्त केला. रस्ता रुंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुरू आहेत. या मार्गावर जाताना अनेकांना अपघाताशी सामना करावा लागत आहे. शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीत कापूस भरुन खेतिया येथे विक्रीसाठी जात असताना सुसरी धरण वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे  टाळण्याच्या प्रयत्नात  ट्रॅक्टर व ट्रॉलीचे चाक खड्ड्यात आल्याने तोल अचानक बाजूला पडल्याने ते उलटून अपघात झाला.

किमान खड्डे तरी बुजवा...गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे  काम सुरू आहे. काही रस्तादेखील तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास विभाग नाशिक यांच्याकडे हा रस्ता हस्तांतर केला त्या वर्षापासून काम सुरू केले. परंतु काही भागात रस्त्याची पूर्णतः ‘वाट’ लागली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता होईल तेव्हा होईल मात्र तोपर्यंत निदान रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

शेतमाल व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळसध्या शेतकरी कापूस विक्रीसाठी आपआपल्या वाहनात कापूस भरुन खेतिया येथे आणत आहेत. तसेच सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने जीव मुठीत घेऊन तेवढा रस्ता पार करावा लागत आहे. त्यातच वाहनांचा खड्ड्यात तोल गेल्यास वाहन उलटून अपघात होत आहेत. यात वाहन चालक व शेतकऱ्यांना दुखापती होत आहेत. खेतिया येथे कापूस विक्रीसाठी मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी तेथे कापूस विक्रीसाठी नेतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांना अपघात होऊन शेतमाल व वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.