शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

सुसरी धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

यंदा जून व जुलै महिन्यांंत अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत ...

यंदा जून व जुलै महिन्यांंत अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. सुरुवातीला पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तिसऱ्यांदा हीच परिस्थिती निर्माण होते काय, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल, अशी आशा लागली आहे. तालुक्यातील गोमाई नदी परिसरात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच आहे. शेकडो एकर जमीन बागायतीखाली येत आहे. शेतकरी मुख्यत: केळी, ऊस, पपई ही पिके घेतात. सातपुडा पर्वतरांगेतून येणाऱ्या सुसरी नदीवर दरा फाटालगत दरा धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे पावसाळ्यात थांबत असलेल्या पाण्याचा निचरा होऊन हजारो एकर शेतीच्या कूपनलिका व विंधन विहिरी जिवंत झालेल्या आहेत. पाण्याची पातळी वाढली असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यास लगतच असलेल्या गोमाई नदीच्या पात्रात पाण्याच्या विसर्ग करण्यात येतो. येथील शेतकऱ्यांची मुख्य मदार सुसरी धरणावर असल्याने गेल्या महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती. परंतु, आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडले असून त्यातून दोन हजार ४७९ क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

मध्य प्रदेश राज्यातून गोमाई नदीचा उगम झालेला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मध्य प्रदेशातील खरगोन गावालगत गोमाई नदीवर मोठे धरण बांधल्यामुळे नदीला येणारा महापूर हा आता थांबलेला आहे. सध्या सातपुडा पर्वतात झालेल्या पावसाचे पाणी नदी-नाले यांच्या माध्यमातून व गोमाई पात्रात आल्यास शहराला लागून असलेली नदी प्रवाहित होते. पूर्वी बारमाही वाहणारी गोमाई नदी आता केवळ तीन ते चार महिने वाहते. परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून गोमाई नदीवर ठिकठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधणे गरजेचे आहे.