शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

सुसरी धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

यंदा जून व जुलै महिन्यांंत अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत ...

यंदा जून व जुलै महिन्यांंत अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. सुरुवातीला पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तिसऱ्यांदा हीच परिस्थिती निर्माण होते काय, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल, अशी आशा लागली आहे. तालुक्यातील गोमाई नदी परिसरात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच आहे. शेकडो एकर जमीन बागायतीखाली येत आहे. शेतकरी मुख्यत: केळी, ऊस, पपई ही पिके घेतात. सातपुडा पर्वतरांगेतून येणाऱ्या सुसरी नदीवर दरा फाटालगत दरा धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे पावसाळ्यात थांबत असलेल्या पाण्याचा निचरा होऊन हजारो एकर शेतीच्या कूपनलिका व विंधन विहिरी जिवंत झालेल्या आहेत. पाण्याची पातळी वाढली असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यास लगतच असलेल्या गोमाई नदीच्या पात्रात पाण्याच्या विसर्ग करण्यात येतो. येथील शेतकऱ्यांची मुख्य मदार सुसरी धरणावर असल्याने गेल्या महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती. परंतु, आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडले असून त्यातून दोन हजार ४७९ क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

मध्य प्रदेश राज्यातून गोमाई नदीचा उगम झालेला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मध्य प्रदेशातील खरगोन गावालगत गोमाई नदीवर मोठे धरण बांधल्यामुळे नदीला येणारा महापूर हा आता थांबलेला आहे. सध्या सातपुडा पर्वतात झालेल्या पावसाचे पाणी नदी-नाले यांच्या माध्यमातून व गोमाई पात्रात आल्यास शहराला लागून असलेली नदी प्रवाहित होते. पूर्वी बारमाही वाहणारी गोमाई नदी आता केवळ तीन ते चार महिने वाहते. परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून गोमाई नदीवर ठिकठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधणे गरजेचे आहे.