शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तळोदा तालुक्यातील ४० गावांचा सर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

तळोदा : शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भूजल यंत्रणेने तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ४० गावांचा सर्वे केला ...

तळोदा : शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भूजल यंत्रणेने तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ४० गावांचा सर्वे केला असून, तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात आला आहे. आता पुढील कार्यवाही तातडीने हाती घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सर्वेत सातपुड्यातील अनेक पाड्यांचादेखील समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून जलजीवन मिशन योजना हाती घेतली आहे.

सदर योजना सरकार सन २०२४ पर्यंत संपूर्ण देशात राबविणार आहे. या योजनेतून शासन ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना सक्षम करून त्याद्वारे हर घर नल कनेक्शन देण्याचे नियोजन आहे. यात नवीन कूपनलिका, जलकुंभ, पाईप लाईन अशी कामेदेखील घेता येत असतात. तथापि यासाठी भूवैज्ञानिक यांचा अहवाल अपेक्षित असतो. त्यामुळे भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तळोदा तालुक्यात असा सर्वे नुकताच पूर्ण केला असून, त्यांनी साधारण ४० गावांचा सर्वे केला आहे. यात सातपुड्यातील काही पाड्यांचा समावेश आहे. या यंत्रणेने केलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणात कूपनलिकांच्या जागा निश्चित केल्या आहेत. तसा अहवालही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. आता नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पुढील तांत्रिक कार्यवाहीची आवश्यकता असल्याने संबंधित विभागाने ही कार्यवाही तातडीने हाती घेण्याची मागणी ग्रामीण जनतेने केली आहे. कारण संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन सर्वे केल्यानंतर गावकऱ्यांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत आशाही पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी सुध्दा याबाबत ठोस प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या अर्धा पावसाळा संपूनही सरासरीचे अर्धे पर्जन्यमान नाही. त्यामुळे अजूनही भूजलातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. विशेष म्हणजे धरणाचा जलसाठा १० टक्केसुध्दा वाढलेला नाही. त्यामुळे आतापासूनच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आढावा बैठकीत पाणी पुरवठा योजनेचीच मागणी

जुलै महिन्याच्या शेवटी येथील आदिवासी विकास भवनात आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध योजनांच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत महसूल प्रशासनाबरोबरच पंचायत समिती प्रशासन, त्यांचे कर्मचारी, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. त्यावेळी ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावादेखील घेण्यात आला होता. विशेष म्हणजे ग्रामपंचायतनिहाय आढावा घेण्यात आला होता. तेव्हा अनेक सरपंचांनी भविष्यातील पाणी समस्येबाबत प्रश्न उपस्थित करून वाढीव पाणीपुरवठा, जलवाहिन्या, जलकुंभ आदींची मागणी केली होती. काहींनी तर म्हणजे पाड्यामध्ये आजतागायत नळपाणी पुरवठा योजनाच राबवलेली नाही. त्यामुळे ही योजना करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शासनाचा जलजीवन मिशनमधून मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सहाजिकच पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने विशेषत: दुर्गम भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.