शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कमी लोकसंख्येच्या गावाची अशीही व्यथा़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:16 IST

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसंख्या कमी असली की विकासाची गती वाढते असं म्हटलं  जातं, याचा ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसंख्या कमी असली की विकासाची गती वाढते असं म्हटलं  जातं, याचा प्रत्यय एव्हाना येतोच़ परंतू बोटावर मोजली जाणारी माणसे असूनही विकासापासून लांबच असल्याचं उदाहरण म्हणजे वरवली ता़ धडगाव हे गाव आह़े जाण्यासाठी रस्ता किंवा इतर कोणतीही सुविधा नसलेल्या या गावाची व्यथा म्हणजे असुविधांची कथाच आह़े  2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 11 हजार 4 लोकसंख्या असलेलं गाव म्हणजे लोणखेडा ता़ शहादा तर सर्वाधिक कमी केवळ 26 व्यक्तींचा निवास असलेलं गाव म्हणून वरवली ता़ धडगाव याचा उल्लेख करण्यात येतो़ 2011 च्या जनगणनेनंतर 8 वर्षे उलटूनही यात फारसा काही फरक पडलेला नसल्याचे वरवली येथे प्रकर्षाने दिसून येत आह़े आठ वर्षात 26 ऐवजी लोकसंख्या 36 एवढी झाली असली तरी विकासाची मात्र प्रतिक्षा कायम आह़े  भूषा ता़ धडगाव ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या वरवली या गावाला नोव्हेंबर 2018 मध्ये महसूली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर तरी समस्या सुटणार अशी अपेक्षा होती़ परंतू धडगाव तालुका प्रशासनात काम करणा:या अनेकांना ‘ह्या नावाचे गाव अस्तित्वात आहे का,’ हाच पहिला प्रश्न पडतो़ भूषा पॉईंटपासून मणिबेलीकडे जाताना डाव्या बाजूला चहू बाजूने पाण्याने वेढलेल्या टेकडीवर सात ते आठ घरांची वस्ती असलेल्या वरवलीर्पयत पोहोचण्यासाठी खाजगी बोट किंवा बाजर्चा आधार घ्यावा लागतो़ नर्मदा विकास विभागाच्या बार्ज उपलब्ध न झाल्यास येथील ग्रामस्थ धडगाव येथे विविध कामांसाठी होडीने येतात़ सरदार सरोवरातून होडीने भूषा पॉईंटर्पयत पोहोचण्यासाठी त्यांना किमान दीड ते पावणे दोन तास लागतात़ पावसाळ्यात मात्र संपर्क तुटत असल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती देण्यात आली़ बाह्यजगाशी खूप संपर्क नसलेल्या या गावात वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, मोबाईल, टीव्ही, दूरध्वनी किंवा तत्सम कोणतेही डिजीटल साहित्य आजवर पोहोचलेले नाही़ अशा स्थितीतही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही येथे आदिवासी बांधव येथे निवास करत आहेत़ शिक्षणाची कोणतीही सोय नसल्याने येथील बालके शाळबाह्यच असल्याचे तेथे भेट दिल्यास सर्वात आधी समोर येत़े एकीकडे असुविधा असल्या तरी एकमेकांच्या मदतीला धावून सर्वजण कायम सोबत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आल़े 

देशातील सर्वात कमी लोकसंख्येची वस्ती ही अंदमान निकोबार बेटसमूहातील ईस्ट बेटावर आह़े येथे केवळ 16 लोक राहतात़ त्यानंतर अरुणालचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेशात किमान 350 लोकसंख्या असलेली गावे आहेत़ या गावांना वर्षभरात अनेक जण भेटी देऊन तेथील विकासावर चर्चा करत असतात़ परंतू 36 लोकसंख्येच्या वरवली गावाच्या आजवरच्या इतिहासात शासकीय कर्मचा:याने येथे भेटच दिलेली नसल्याचा दावा केला जातो़  

भूषा पॉईंटपासून सरदार सरोवरातून बाजर्ने गेल्यावर 15 मिनीटात डोंगरावर सात ते आठ घरांचा समूह दिसून येतो़ येथे पिण्याचे पाणी म्हणून नर्मदेच्या पाण्याचा वापर होतो़ बाह्यजगाशी संपर्क ठेवण्याचे साधन म्हणून येथे केवळ एक खाजगी होडी आह़े त्यातून वेळीअवेळी प्रवास करत येथील नागरिक मुख्य प्रवाहात येण्याचा आटोकाट प्रयत्न करतात़ गावात अद्यापही शासनाचे स्वच्छ भारत अभियान पोहोचलेले नसल्याचे नजरेस पडत़े 

बिबटय़ा आणि अस्वालासारखे हिंस्त्र प्राणी, विषारी साप आणि सरोवराच्या पाण्यातील मगरी यांची कायम दहशत असूनही येथील नागरिक जीवन कुंठीत आहेत़ अत्यंत दुर्गम अशा या गावात रोजगार नसल्याने काहींनी स्थलांतर केल्याने येथे तूर्तास चार ते पाच कुटूंबांचा रहिवास आह़े 

काहींनी आसपासच्या गावांमध्ये शिक्षण घेतले असले तरी रोजगाराअभावी ते घरीच आहेत़  प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या गावाचे स्थलांतर झाले असले तर मग, नोव्हेंबर 2018 मध्ये महसूली गावाचा दर्जा नेमका कशासाठी असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो़ आरोग्य विभागाकडून चालवण्यात येणा:या तरंगत्या दवाखान्याची मात्र येथील ग्रामस्थांना मोठी मदत होत असल्याचे सांगण्यात आल़े आठवडय़ातून एकदा डोंगराखाली पाण्यात येणा:या दवाखान्यातून लहान बालकांसाठी औषधी मिळून तात्पुरती सोय होत़े 

केवळ 26 नागरिकांची नोंद असलेल्या या गावातील युवकांना मतदान ओळखपत्र, नव्या शिधापत्रिकांसह विविध दाखले देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ दाखला काढण्यासाठी गेल्यावर युवकांना धडगावला मुक्कामच करावा लागतो़