शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शहरी व ग्रामीण ...

सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शहरी व ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. सध्या दहावी व बारावीचे निकाल लागल्याने पालक व विद्यार्थी विविध डिप्लोमा व इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करीत आहेत. मात्र त्यांना ये-जा करण्यासाठी वेळेवर बस नसल्याने अतोनात हाल होत आहेत. विद्यार्थी व पालकांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत असल्यामुळे आर्थिक व वेळेचा अपव्यय होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना कामासाठी व व्यवहारासाठी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असतात व पूर्ण वाहन प्रवासी भरल्याशिवाय निघत नाही. ग्रामीण भागातील मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. राणीपूर, लक्कडकोट, नागझिरी, अंबापूर, गणोर, टवळाई, आमोदा, फत्तेपूर, कुसुमवाडा, नावागाव, कन्साई, भुतेआकसपूर, कुढावद आदी गावांतील विद्यार्थ्यांना म्हसावद, लोणखेडा व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी बस नाही. परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. ग्रामीण भागात एसटी बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थी करीत आहेत.