शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

आमरस-पुरीच्या पाहुणचाराने विद्यार्थी तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:25 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील केंद्रशाळेत दर शनिवारी विद्याथ्र्याना रुचकर भोजन देण्यात येते. आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभात तयार विद्याथ्र्याना मध्यान्ह भोजन देण्यात येते. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे.विद्याथ्र्यानी शाळेत नियमित यावे, पटसंख्या वाढावी,  शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षक विविध प्रय} करताना दिसून येतात. असाच प्रयोग येथील मुलांच्या जि.प. शाळेत सुरू आहे. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत महिन्यातून किमान चार दिवस विद्याथ्र्याना पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार दिला जावा, अशी तरतूद आहे. विद्याथ्र्याना पूरक आहार मिळावा यासाठी येथील शिक्षकांनी वेगळीच शक्कल लढवून दर शनिवारी आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचा पाहुणचार विद्याथ्र्याना दिला जात आहे.  इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा पालकांचा कल जास्त दिसून येतो. त्यामुळे जि.प. शाळांकडे मुलांची संख्या कमी होताना दिसते. मात्र जि.प. शाळेतील शिक्षकही शिकविण्यासोबतच अन्न शिजविण्याच्यार्पयत  जातीने लक्ष देऊन विद्याथ्र्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. शिक्षणासोबतच शालेय पोषण आहारात जर बदल केला तर नक्कीच शालेय पटसंख्येत वाढ होईल, असे त्यांना वाटते आणि ते खरेही ठरत आहे. शनिवार म्हटला की विद्याथ्र्याची उपस्थिती घटते. त्यामुळे शनिवारी विद्याथ्र्याना पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक रामलाल परधी यांनी विद्याथ्र्याना चक्क आमरसाची मेजवानी दिली. त्यासोबत रशी-भातचे जेवणही दिले. शिक्षक दर्पण भामरे यांनी स्वत: बाजारात जाऊन आंबे आणले. शिक्षिका संगीता राणे, अनिता पाटील यांनी पोषण आहार शिजविणा:या महिलांच्या सहकार्याने शाळेतच आंब्याचा रस तयार केला. या पाहुणचारामुळे विद्यार्थीही खूष झाले. शनिवारीही विद्याथ्र्याना आमरससोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचे जेवण देण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख एन.आर. निकुंभ उपस्थित होते. शाळेत शनिवारी राजगिराचे लाडू, बिस्किट, अंडी, सफरचंद, शेंगदाणे, चिक्की, शिरा आणि आता चक्क आमरस यामुळे विद्याथ्र्यामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होत असून विद्याथ्र्यानाही पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार मिळत आहे.