शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजूर पुरविण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा ...

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजूर पुरविण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होऊन शेतकऱ्यांचा किमान मजुरीचा पैसा वाचल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जे आत्महत्या करीत आहेत, त्यास थोड्याफार प्रमाणात अटकाव होईल. जेणेकरून ग्रामपंचायतीमध्ये शेतमजुरांच्या मागणीचा अर्ज ग्रामपंचायतीत दाखल करून शेतकरी व शेतमजुरांना दोघांना समान न्याय मिळेल, मजुरांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल. तसेच शेतकऱ्यांचा मजुरीचा पैसा वाचवून दोन पैसे त्याच्या खिशातही राहतील, म्हणून भविष्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतमजूर व शेतकरी यांचा ग्रामपंचायतीमार्फत समन्वय साधून महाराष्ट्रातील शेतमजूर व शेतकरी या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे कराल, अशी आम्ही आशा बाळगतो. या प्रश्नावर येत्या महिन्याभराच्या आत योग्य तो निर्णय झाला नाही, तर भारतीय किसान सेनेतर्फे महाराष्ट्र राज्यात शेतकरी व शेतमजुरांचे मोठे आंदोलन उभारून मंत्रालयावर धडक देऊ व होणाऱ्या विपरित परिणामास सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

निवेदनावर किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, प्रदेश संघटक सुरेश जगदेव, प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब नगराळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौतम चौधरी, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष छत्रपालसिंग मोरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अंकलेश वळवी, जिल्हा महासचिव आधार ठाकरे, नंदुरबार भटके विमुक्त सेल अध्यक्ष कांतिलाल जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पिंपळे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष विजय पाटील, धुळे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष गनी शेख रहेमान, धुळे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, नंदुरबार तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष सिंगा पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष केशव तडवी, नवापूर तालुकाध्यक्ष गौतम गावीत, तुलसीदास गावीत, सुधाकर वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.