शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजूर पुरविण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा ...

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजूर पुरविण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होऊन शेतकऱ्यांचा किमान मजुरीचा पैसा वाचल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जे आत्महत्या करीत आहेत, त्यास थोड्याफार प्रमाणात अटकाव होईल. जेणेकरून ग्रामपंचायतीमध्ये शेतमजुरांच्या मागणीचा अर्ज ग्रामपंचायतीत दाखल करून शेतकरी व शेतमजुरांना दोघांना समान न्याय मिळेल, मजुरांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल. तसेच शेतकऱ्यांचा मजुरीचा पैसा वाचवून दोन पैसे त्याच्या खिशातही राहतील, म्हणून भविष्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतमजूर व शेतकरी यांचा ग्रामपंचायतीमार्फत समन्वय साधून महाराष्ट्रातील शेतमजूर व शेतकरी या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे कराल, अशी आम्ही आशा बाळगतो. या प्रश्नावर येत्या महिन्याभराच्या आत योग्य तो निर्णय झाला नाही, तर भारतीय किसान सेनेतर्फे महाराष्ट्र राज्यात शेतकरी व शेतमजुरांचे मोठे आंदोलन उभारून मंत्रालयावर धडक देऊ व होणाऱ्या विपरित परिणामास सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

निवेदनावर किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, प्रदेश संघटक सुरेश जगदेव, प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब नगराळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौतम चौधरी, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष छत्रपालसिंग मोरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अंकलेश वळवी, जिल्हा महासचिव आधार ठाकरे, नंदुरबार भटके विमुक्त सेल अध्यक्ष कांतिलाल जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पिंपळे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष विजय पाटील, धुळे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष गनी शेख रहेमान, धुळे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, नंदुरबार तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष सिंगा पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष केशव तडवी, नवापूर तालुकाध्यक्ष गौतम गावीत, तुलसीदास गावीत, सुधाकर वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.