शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात अडीच हजार अंगणवाडींमध्ये सौर उज्रेचा प्रकाश

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: January 1, 2018 12:32 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडय़ा-पाडय़ांसह इतर भागातीलही 2400 अंगणवाडय़ा नवीन वर्षात सौर उज्रेने उजळणार आहेत. महावितरणतर्फे तसा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे. अंगणवाडय़ांप्रमाणेच ज्या शाळांर्पयत वीज पोहचलेली नाही अशा 340 शाळांना देखील सौर उज्रेद्वार वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील भौगोलिक ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडय़ा-पाडय़ांसह इतर भागातीलही 2400 अंगणवाडय़ा नवीन वर्षात सौर उज्रेने उजळणार आहेत. महावितरणतर्फे तसा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे. अंगणवाडय़ांप्रमाणेच ज्या शाळांर्पयत वीज पोहचलेली नाही अशा 340 शाळांना देखील सौर उज्रेद्वार वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे अनेक गावांर्पयत वीज पोहचू शकली नाही. त्यामुळे शाळा आणि अंगणवाडय़ांचा प्रश्न तर लांबच आहे. ही बाब लक्षात घेता ज्या भागात वीज पोहचू शकत नाही अशा भागात सौर उज्रेचा पर्याय आता खुला करण्यात आला आहे. यामुळे अशा शाळा आता सौर उज्रेच्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहेत.अडीच हजार अंगणवाडीजिल्ह्यात सात प्रकल्पात एकुण दोन हजार 434 अंगणवाडी आहेत. या अंगणवाडींमध्ये हजारो बालके दाखल आहेत. बालकांच्या शिक्षणासह अंगणवाडी कर्मचा:यांना पुरक पोषण आहार, कुपोषीत बालकांची काळजी, मातांसाठीचा पुरक पोषण आहार यासह इतर कामे पहावी लागतात. या सर्व कामांचे रेकॉर्ड लिखीत स्वरूपात या कर्मचा:यांना ठेवावे लागतात. परिणामी अनेकवेळा दप्तर गहाळ होणे, कागदपत्रे हरविणे असे प्रकार घडतात. ही बाब लक्षात अंगणवाडींमध्ये संगणक देवून ती माहिती त्यात संकलीत करण्याची बाब पुढे आली. परंतु अंगणवाडींना वीज पुरवठाच नसल्यामुळे ती बाबही बारगळली. आता सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा होणार असल्यामुळे संगणकांचा मार्गही मोकळा होणार आहे.डिजीटल लर्निगला मदतशहरी भागात खाजगी अंगणवाडय़ा, प्ले स्कूलमध्ये बालकांना डिजीटल पद्धतीद्वारा शिकवले जाते. त्यामुळे ग्रामिण भागातील अंगणवाडय़ांमध्ये देखील डिजीटल लर्निग असावे अशी मागणी पुढे आली होती. आता सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा होणार असल्यामुळे डिजीटल लर्निगचा मार्ग मोकळा होणार आहे.अनेक ठिकाणी कुडाच्या घरातदुर्गम भागातील अनेक अंगणवाडय़ा आजही कुडाच्या घरात भरतात. अंगणवाडय़ांना इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या घरात, भाडय़ाच्या घरात किंवा ग्रामपंचायतीच्या खोलीत अशा अंगणवाडी चालतात. असे असतांना अशा ठिकाणी सौर उज्रेवर कशा व कोणत्या पद्धतीने वीज पुरवठा केला जाईल. ही बाब सहाजिकच समोर येते. जिल्ह्यात आजच्या स्थितीत जवळपास 600 अंगणवाडय़ांना इमारत नसल्याचे चित्र आहे. विकास आराखडा तयारजिल्ह्यातील अंगणवाडींना सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुर्गम भागात भेट दिली असता त्यांनी तातडीने या कामाला प्राधान्य देण्याचे सुचीत केले होते. त्यानुसार महावितरणच्या अधिका:यांनी विकास आराखडा तयार केला आहे. येत्या वर्षभरात शासनाच्या मालकीच्या इमारतीत भरत असलेल्या अंगणवाडींना सौर पॅनेल पुरवून वीज पुरवठा दिला जाणार आहे.प्राथमिक शाळांचाही समावेशजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार 393 शाळा इमारती आहेत. त्यापैकी एक हजार 53 शाळा इमारतींना वीज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित 340 शाळा इमारतींना वीज पुरवठासाठी अनंत अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेता अशा सर्वच 340 शाळा इमारतींना देखील सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचाही विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो देखील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.