शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तर मग दुष्काळी सर्वेक्षणाची तयारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

नंदुरबार : जिल्ह्यात आजअखेरीस ४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या बळावर शेतीक्षेत्रात ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात आजअखेरीस ४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या बळावर शेतीक्षेत्रात ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जमिनीतील ओलाव्याच्या बळावर केलेल्या पेरण्यांना येत्या १५ दिवसात योग्य तो पाऊस न मिळाल्यास पिके हातून जाण्याची चिन्हे आहेत. यातून १६ ऑगस्टनंतरही पाऊस न आल्यास कृषी विभाग दुष्काळी चाचपणीसाठी सर्वेक्षण मोहीम राबवून शासनाला आढावा देणार आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने संथ सुरुवात केल्याने १२ ऑगस्टपर्यंत २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानुसार १२ ऑगस्टपर्यंत सरासरी ५८३ मिलिमीटर पाऊस कोसळण्याची अपेक्षा असते. परंतु यंदा मात्र निम्मे पाऊसच झाला आहे. सरासरीपेक्षा ५२ टक्के पाऊस कमी झालेला असल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतीक्षेत्रावर झाला आहे. परिणामी शेतशिवारात पेरणी करण्यात आलेली बहुतांश पिके ही जमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. या पिकांना सध्या ढगाळ वातावरण तारून नेत आहे. दरम्यान आगामी संपूर्ण आठवडाभरात पाऊस नसल्याची माहिती असली तरी २० ऑगस्टनंतर मात्र जिल्ह्यात पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची सरासरी यंदा कमी झाली असल्याने शासकीय कामकाज सुरू झाले आहे. येत्या काळात पाऊस न कोसळल्यास मंडळनिहाय माहिती घेत दुष्काळी स्थितीची चाचपणी केली जाणार आहे.

३७ दिवस कोरडे

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात ३७ दिवस हे कोरडे अर्थात बिनापावसाचे आहेत.

जून - कोरडे दिवस १५

जुलै -कोरडे दिवस १४

ऑगस्ट महिन्यात आजअखेरीस केवळ चार दिवस पाऊस कोसळला असून आठ दिवस हे कोरडे असल्याचे समोर आले आहे.

३६ दिवस पावसाचे

२४ तासात २.५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होणे म्हणजे तो दिवस पावसाचा गणला जातो. २४ तासात २.५ मि..मी.पेक्षा कमी पाऊस होणे म्हणजे कोरडा दिवस असतो.

जुन महिन्यात १५, जुलै महिन्यात १७ तर १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूण २­८३ मिलीमीटर हा पाऊस झाला आहे.

पीकवाढीच्या अवस्थेत म्हणून धोका अधिक : जिल्ह्यात यंदाही कापूस पिकाला पसंती आहे. १ लाख २६ हजार हेक्टर कापूस लागवड पूर्ण झाली आहे. यातील ९० टक्के कापूस हा ३० दिवसांचा आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास या कापसाची अवस्था बिकट होऊन शेतकरी पिकाला मुकण्याची शक्यता अधिक आहे.

कडधान्य पिके कमीच

जिल्ह्यात यंदा ३७ हजार ८३४ हेक्टरवर यंदा कडधान्य पिके अपेक्षित होती. परंतु पावसाअभावी केवळ २० हजार ८९९ हेक्टर कडधान्य पिके पेरा झाला आहे. यात बरेच उत्पादन हे खराब झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात खरीप पिके निर्धारित करण्यात आली होती. त्यातुलनेत आजअखेरीस २ लाख ५९ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण ९१. ६ टक्के ह्या पेरण्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय पेरणीचा आढावा घेतला असता, नंदुरबार तालुक्यात ६६ हजार ८४०, नवापूर ५३ हजार ८१२, शहादा ७१ हजार ०९, तळोदा ११ हजार ३८३, धडगाव १९ हजार २२९ तर अक्कलकुवा तालुक्यात ३७ हजार ३९८ हेक्टर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. यात तळोदा तालुका वगळता इतर पाच तालुक्यात पेरण्या पूर्ण क्षमतेने झाल्या आहेत. शहादा तालुक्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

पाऊस कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. येत्या २० ऑगस्टनंतर जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे.

-सचिन फड, हवामान विशेषज्ञ, जिल्हा हवामान केंद्र, कोळदे, ता. नंदुरबार.