शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Vidhan Sabha 2019: चूप चूप बैठे हो जरूर कोई बात है..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:00 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची धूरा सांभाळणारे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे निवडणुकीच्या घडामोडीत अद्यापही पूर्वीप्रमाणे प्रभावीपणे सक्रीय न झाल्याने अनेक नवीन चर्चाना उधान आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा राखीव आहेत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसची धूरा गेल्या काही वर्षापासून जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हेच सांभाळत आहेत. त्यामुळे जिल्हाभर त्यांचा वैयक्तिक प्रभाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये त्यांची भुमिका काँग्रेस पक्षात महत्वाची राहिली आहे. गेल्या वर्षी आजारपणामुळे वर्षभर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे फारसे सक्रीय नव्हते. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आता सार्वजनिक जिवनात सक्रीय झाल्याने या विधानसभा निवडणुकीत ते अधीक सक्रीय होतील असा काँग्रेस कार्यकत्र्याचे म्हणने आहे.सध्या जिल्ह्यातून काँग्रेसच्या दोन मोठय़ा कार्यकत्र्यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील हे दोन्ही नेते भाजपवासी झाले आहे. त्यांना पक्षांतरापासून रोखण्याचा  काँग्रेसचा प्रय} झाले नसल्याची चर्चा आहे. किंबहुना पक्षांतराची चर्चा आता बडय़ा नेत्यांभोवतीच येवून घोंगाळत आहे. आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चार महिन्यांपूर्वी चर्चा होती. त्यावेळी त्यांनी स्वप्नातही काँग्रेस सोडण्याचा विचार येणार नाही असा खुलासा केला होता. त्यानंतर ही चर्चा थांबली होती. आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे नुकताच कौटूंबिक कार्यक्रम झाला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी देखील मिश्किलपणे काही चर्चा रंगल्या होत्या. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्याचे पक्ष पातळीवर चर्चा आहे. पक्षाचे सूत्र सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे आहे. राज्याच्या समितीवर त्यांची निवड झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मात्र आमदार रघुवंशी यांच्या व्यक्तीगत सर्वच मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते चारही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आहे. एरव्ही कुठलीही निवडणूक लागली की आमदार रघुवंशी यांचे जिल्हाभर दौरे, मेळावे सुरू होतात. विरोधकांवर आक्रमकपणे ते शब्द शैलीतून वार करतात. त्यामुळे राजकारणात रंगत येते आणि काँग्रेस कार्यकत्र्यामध्येही उत्साह संचारतो. यावेळी मात्र अद्याप तरी तशी स्थिती निर्माण झालेली नाही. रघुवंशींनी स्थानिक स्तरावर घेतलेल्या कार्यकत्र्याच्या बैठका, नेत्यांशी हितगूज वगळता जाहीरपणे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी समोर आलेले दिसत नाही. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये पुन्हा किंतू, परंतूचा शंका सुरू झाल्या असून आमदार रघुवंशी कधी पूर्वीप्रमाणे काँग्रेस कार्यकत्र्यामधील मरगळ दूर करण्यासाठी मैदानात उतरतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.