शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जिल्ह्यात संततधार ‘श्रावणसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

नंदुरबार : अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा असलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, पावसामुळे नदी-नाल्यांना ...

नंदुरबार : अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा असलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे तळोदा शहरातील दुकानांमध्ये पाणी गेल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. नंदुरबार, शहादा, तसेच इतर ठिकाणीही दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी साडेसातपर्यंत पाऊस सुरू असल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते.

ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात २८३ मिलीमीटर पाऊस कोसळला होता. सोमवारी हवामान खात्याने जिल्ह्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. यातून मंगळवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होऊन उकाडा जाणवत होता. दुपारी दोन वाजल्यापासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. कुठे संततधार तर कुठे मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिक सुखावले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत हा पाऊस तीव्र आणि मध्यम स्वरूपात सुरू होता. नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्रात संपर्क केला असता, सरासरी ४० मिलीमीटरपर्यंत पाऊस कोसळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर भागांतही ५० ते ६० मिलीमीटरपर्यंत पाऊस कोसळला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. हवामान खात्याकडून येत्या तीन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी सध्या तरी सुखावले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

तळोद्यातील व्यावसायिक त्रस्त

तळोदा शहरात दुपारपासून पाऊस सुरू झाल्यानंतर, मेन रोड आणि काॅलेज रोड भागातील घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी गटारींचे पाणी घरात येत असल्याने नागरिक हतबल झाले होते. शहरातील भन्साली प्लाझा, तसेच हातोडा रोडवरील दुकानांमधून रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसून आले होते. पालिकेने याकडे आता तरी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

शहाद्यात दीड महिन्यांनंतर हजेरी

दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी शहादा शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात होऊन दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील मैदाने, शाळांचे आवार, बाजारपेठ, तसेच रस्त्यांवर पाणी साचले होते. मंगळवार असल्याने बाजारात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची पावसामुळे धावपळ उडाली होती.

नंदुरबारात रस्ते जलमय

नंदुरबार शहरात दुपारी दोन वाजल्यापासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली होती. सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस सुरू झाला.

सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. मंगळबाजारात पाणी साचले होते.

श्रावणात कोसळणार्‍या पावसासोबत विजा चमकून ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने नागरिकांनी सावध पवित्रा घेत सुरक्षित स्थळ गाठले होते.

ग्रामीण भागात पाऊस

नंदुरबार तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोरड क्षेत्रातील कापूस व सोयाबीन पिकाला आधार मिळाला आहे.

शहादा तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. कोंढावळ, जयनगर, सारंगखेडा या परिसरात पावसाने हजेरी दिली. मंदाणे, तसेच मध्य प्रदेश हद्दीलगतही पाऊस होता. पावसामुळे शेतशिवारात काम करणार्‍या मजुरांची पावसामुळे धांदल उडाली होती.

नुकसानीची कोठेही नोंद नाही : संततधार कोसळलेल्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची वित्त किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सर्व ३६ महसुली मंडळांतून देण्यात आली आहे. दुर्गम भागात रात्री उशिरा पावसाने पुन्हा जोर धरल्याची माहिती देण्यात आली आहे.

तळोदा तालुका आणि शहरात दीड महिन्यानंतर मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील मेन रोड, कॉलेज रोडवरील दुकाने, घरांमध्ये प्रचंड पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल अडीच तास चाललेल्या या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. कॉलेज रस्त्यावरील पाणी तेथील घरे, दुकाने, मेन रोड, बस स्थानक परिसरातील दुकानांमध्ये प्रचंड पाणी शिरले होते. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

रात्री उशिरापर्यंत हे दुकानदार आपल्या दुकानातून पाणी बाहेर काढत होते. दर वर्षी मुसळधार पावसामुळे या भागातील व्यावसायिक यांना असा पाण्याचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे नगरपालिका काहीच कार्यवाही करायला तयार नसल्याने दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे शहराला लागून असलेल्या नवीन वसाहतीमध्येही पाणी साचले.