शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सलग दुसऱ्या वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांतप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात श्रावण अमावास्येला ...

दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांतप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात श्रावण अमावास्येला बैल पोळा सण मोठ्या उत्साहात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्यांकडून सकाळी बैलांची अंघोळ, त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या अंगावर झालर तसेच फुगे यांसारख्या विविध वस्तूंनी त्यांना सजविले जाते. नंतर गावागावांत असलेल्या हनुमान मंदिरापर्यंत वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर संध्याकाळी बैलांची प्रत्येक घरोघरी शेतीउपयोगी साहित्यासोबत विधीवत पूजा केली जाते. नंतर त्यांना पुरणपोळीचे पदार्थ खाऊ घातले जातात. अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये बैलपोळा सण साजरा होत असतो. मात्र, इतिहासात मागील वर्षी प्रथमत: बैलपोळा हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना साधेपणाने साजरा करावा लागला होता. या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता, सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांना बैलपोळा हा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.