शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सारंगखेडा गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म नियोजन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमाने व स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सारंगखेडा हे आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. आता स्थानिक विलगीकरण कक्षात फक्त दोन कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

७४ लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

येथील ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य विभागाकडून नुकतीच ७४ लोकांची अँटिजन कोरोना चाचणी केली असता, सर्वच लोकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांत वेळोवेळी स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी, जनजागृती, संशयित रुग्णांना आयसोलेशन न करता ग्रामपंचायत विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करणे, व्यापारी बांधवांनीही शासकीय नियमांचे पालन करत आपला व्यवसाय करणे, या सर्व गोष्टी कोरोना रोखण्यासाठी फलदायी ठरल्याने आज तापी पट्ट्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सारंगखेडा गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी एम. बी. परदेशी, आरोग्य सहायक आर. आर. महिरे, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी संतोष डिगराळे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सर्व परिस्थितीवर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ लक्ष ठेवून होते.

ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाच्या उपायोजना

ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करण्यात आली. तसेच जनजागृती, कोरोना चाचणी, जनता कर्फ्यू, शासकीय नियमांचे पालन, ग्राहकांनी शासनाने दिलेल्या वेळेत खरेदी करून, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींसह उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यानेच प्रशासनाकडून सांगण्यात येते.

कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करायचे असेल, तर प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, हा एकमेव उपाय आहे आणि १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साधले पाहिजे. लस पूर्णतः सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.

- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद