शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म नियोजन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमाने व स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सारंगखेडा हे आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. आता स्थानिक विलगीकरण कक्षात फक्त दोन कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

७४ लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

येथील ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य विभागाकडून नुकतीच ७४ लोकांची अँटिजन कोरोना चाचणी केली असता, सर्वच लोकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांत वेळोवेळी स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी, जनजागृती, संशयित रुग्णांना आयसोलेशन न करता ग्रामपंचायत विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करणे, व्यापारी बांधवांनीही शासकीय नियमांचे पालन करत आपला व्यवसाय करणे, या सर्व गोष्टी कोरोना रोखण्यासाठी फलदायी ठरल्याने आज तापी पट्ट्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सारंगखेडा गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी एम. बी. परदेशी, आरोग्य सहायक आर. आर. महिरे, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी संतोष डिगराळे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सर्व परिस्थितीवर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ लक्ष ठेवून होते.

ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाच्या उपायोजना

ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करण्यात आली. तसेच जनजागृती, कोरोना चाचणी, जनता कर्फ्यू, शासकीय नियमांचे पालन, ग्राहकांनी शासनाने दिलेल्या वेळेत खरेदी करून, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींसह उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यानेच प्रशासनाकडून सांगण्यात येते.

कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करायचे असेल, तर प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, हा एकमेव उपाय आहे आणि १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साधले पाहिजे. लस पूर्णतः सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.

- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद