शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनामुळे यंदाही बैलपोळ्याच्या साजवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

नंदुरबार - सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचा फटका बैलपोळ्याच्या साज तयार करण्यावर झाला आहे. बद्रिझिरा, (ता. नंदुरबार) येथे घरोघरी साज तयार ...

नंदुरबार - सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचा फटका बैलपोळ्याच्या साज तयार करण्यावर झाला आहे. बद्रिझिरा, (ता. नंदुरबार) येथे घरोघरी साज तयार केला जात असतो. यंदा मोजक्याच कुटुंबांकडून साज तयार करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे पोळ्याच्या साजचा रंगोत्सव गावात दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या चार पिढ्यांपासून गावात बैलांचा साज तयार करण्याची परंपरा आहे. पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी बाजारात मिळणारे साज तयार करण्यामागे किती हात राबतात, हे नंदुरबारपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रिझिरा या गावात फिरल्यावर सहज लक्षात येईल. गावातील घरा-घरात साज तयार करण्यासाठी दरवर्षी एकच लगबग दिसून येत असते. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यावर परिणाम झाला आहे. आर्थिक परिस्थिती व इतर कारणांमुळे या गावातील अनेक कुटुंबे मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. परंतु पोळ्याच्या एक महिना अगोदर या कुटुंबांच्या जीवनात बैलांना सजविण्यासाठीचे रंगीबेरंगी साज बनविण्याच्या निमित्ताने एक प्रकारचा रंगोत्सवच सुरू होतो. गेल्या तीन ते चार पिढ्यांची परंपरा टिकवून ठेवत व आपल्यातील कला जिवंत ठेवत बंजारा कुटुंबांनी हा पारंपरिक व्यवसाय व कला टिकवून ठेवली आहे. बैलांचा साज पाहण्यास सहजसोपा वाटत असला तरी, त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे. दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी वस्तू हातानेच तयार केल्या जातात. येथील कलाकुसर आणि कमी कालावधीत मिळणारा साज हे पाहता, या व्यवसायात काही व्यावसायिक शिरले.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक कुटुंबांना कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून विविध साज तयार करवून घेतले जातात. तेच साज बाजारात अवाच्या सवा भावाने विक्री केले जातात. पूर्वी काही कुटुंबे स्वत: साज तयार करून ते बाजारात विक्री करीत असत. परंतु महागाई आणि कच्चा माल घेण्यासाठी लागणारे भांडवल परवडणारे नसल्यामुळे मजुरीच्या स्वरूपात ही कामे केली जातात. कला आणि मेहनतीच्या दृष्टीने मिळणारा मोबदला अगदीच तोकडा असल्याचीही खंत भाईदास पवार यांनी व्यक्त केली.

शिवाय नवीन पिढीचा कल हा नोकरी, व्यवसाय करण्याकडे आहे. त्यामुळे चार पिढ्यांपासून सुरू असलेली ही कला आता दुर्लक्षित होऊ लागली आहे. शिवाय कोरोनासह इतर विविध अडचणी देखील त्याला कारणीभूत आहेत.

पशुधनाची कमी होत चाललेली संख्या, शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ, यंदाची दुष्काळी स्थिती यामुळे पशुधनाची संख्याही कमी होऊ लागली आहे.

शासनाने या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करावी व विविध साहाय्य योजनेच्या माध्यमातून आधुनिक साधने उपलब्ध करून दिल्यास ही कला जिवंत ठेवण्यास मदत होणार आहे.

कोरोना व लॉकडाऊन यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही मोजक्याच कुटुंबांनी बैलांचा साज तयार करण्यास यंदा प्राधान्य दिले. त्यातही अनेकांनी मजुरीवर साज तयार करण्यास प्राधान्य दिले. कारण बाजारात अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात आले.