शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

क्षारमुक्त पाणी साठ्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त राहत असल्यामुळे त्याचा पिकांना धोका निर्माण होतो. हा धोका कमी करीत अपेक्षित साठा करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत सोडले जात आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहत रब्बी हंगामातील पिके घेत असतो. विहीरीतील पाणी संपल्यास शेजारील कुपनलिकांमधून पाणी घेत हंगामासाठी नियोजन करण्याची परंपराच आहे. यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी सातत्याने होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे बहुतांश विहिरींमधील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे त्या-त्या शेतकऱ्यांकडून नेहमीप्रमाणे शेजारील कुपनलिकांमधील पाणी विहीरीत सोडले जात आहे. हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हंगाम पूर्णत्वास नेण्यासाठी या शेतकºयांकडून धावपळ सुरू आहे.हे केवळ जलसाठा वाढविण्यासाठीच नव्हे तर पिकांना क्षारमुक्त पाणी देण्यासाठी देखील पाण्याचे योग्य नियोजन करीत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जिवजंतू शिवाय पिकांना देखील धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी बहुतांश शेतकºयांकडूून विहिरीत सोडले जात आहे. कुपनलिकेच्या या पाण्यात विहीरीतील झºयांचे पाणी मिसळल्याने त्या पाण्यातील क्षार कमी होत असून ते पाणी रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देणारे ठरत आहे. म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांकडून या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

४कुपनलिकेचे पाणी क्षारयुक्त असून तसे पाणी जिवजंतूला धोक्याचे ठरते. त्यामुळे पिण्यासाठी शिवाय स्वयंपाकासाठीही त्याचा वापर केला जात नाही. भांडी फुटत असल्याने त्याचा साठा करणे देखील टाळले जाते. क्षारयुक्त पाणी पिकांना दिल्यास पिकांची वाढच होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत टाकत विहिरीतील झऱ्यांमुळे क्षार कमी होते. त्यामुळे हे पाणी पिकवाढीसाठी उपयुक्त ठरते.विहीरींमध्ये कमी जलसाठा असतो, त्यातून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नाही. हा जलसाठा वाढविण्यासाठी कुपनलिकेतील पाणी विहीरीत सोडले जात आहे. त्यातून हंगाम पूर्णत्वास नेता येतो.शेतीकामासाठी आधी कुपनलिकेचे नियोजन केले जात असल्याने प्रत्येक बांधावर कुपनलिका दिसन येतात. जवळ-जवळ कुपनलिकांमुळे त्या कोरड्या पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरड्या पडल्यास पिकांना पाणीच देता येणार नाही. त्यातून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी विहीरींमध्ये पाणी सोडले जात आहे.