शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

क्षारमुक्त पाणी साठ्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त राहत असल्यामुळे त्याचा पिकांना धोका निर्माण होतो. हा धोका कमी करीत अपेक्षित साठा करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत सोडले जात आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहत रब्बी हंगामातील पिके घेत असतो. विहीरीतील पाणी संपल्यास शेजारील कुपनलिकांमधून पाणी घेत हंगामासाठी नियोजन करण्याची परंपराच आहे. यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी सातत्याने होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे बहुतांश विहिरींमधील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे त्या-त्या शेतकऱ्यांकडून नेहमीप्रमाणे शेजारील कुपनलिकांमधील पाणी विहीरीत सोडले जात आहे. हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हंगाम पूर्णत्वास नेण्यासाठी या शेतकºयांकडून धावपळ सुरू आहे.हे केवळ जलसाठा वाढविण्यासाठीच नव्हे तर पिकांना क्षारमुक्त पाणी देण्यासाठी देखील पाण्याचे योग्य नियोजन करीत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जिवजंतू शिवाय पिकांना देखील धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी बहुतांश शेतकºयांकडूून विहिरीत सोडले जात आहे. कुपनलिकेच्या या पाण्यात विहीरीतील झºयांचे पाणी मिसळल्याने त्या पाण्यातील क्षार कमी होत असून ते पाणी रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देणारे ठरत आहे. म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांकडून या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

४कुपनलिकेचे पाणी क्षारयुक्त असून तसे पाणी जिवजंतूला धोक्याचे ठरते. त्यामुळे पिण्यासाठी शिवाय स्वयंपाकासाठीही त्याचा वापर केला जात नाही. भांडी फुटत असल्याने त्याचा साठा करणे देखील टाळले जाते. क्षारयुक्त पाणी पिकांना दिल्यास पिकांची वाढच होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत टाकत विहिरीतील झऱ्यांमुळे क्षार कमी होते. त्यामुळे हे पाणी पिकवाढीसाठी उपयुक्त ठरते.विहीरींमध्ये कमी जलसाठा असतो, त्यातून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नाही. हा जलसाठा वाढविण्यासाठी कुपनलिकेतील पाणी विहीरीत सोडले जात आहे. त्यातून हंगाम पूर्णत्वास नेता येतो.शेतीकामासाठी आधी कुपनलिकेचे नियोजन केले जात असल्याने प्रत्येक बांधावर कुपनलिका दिसन येतात. जवळ-जवळ कुपनलिकांमुळे त्या कोरड्या पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरड्या पडल्यास पिकांना पाणीच देता येणार नाही. त्यातून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी विहीरींमध्ये पाणी सोडले जात आहे.