लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त राहत असल्यामुळे त्याचा पिकांना धोका निर्माण होतो. हा धोका कमी करीत अपेक्षित साठा करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत सोडले जात आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहत रब्बी हंगामातील पिके घेत असतो. विहीरीतील पाणी संपल्यास शेजारील कुपनलिकांमधून पाणी घेत हंगामासाठी नियोजन करण्याची परंपराच आहे. यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी सातत्याने होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे बहुतांश विहिरींमधील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे त्या-त्या शेतकऱ्यांकडून नेहमीप्रमाणे शेजारील कुपनलिकांमधील पाणी विहीरीत सोडले जात आहे. हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हंगाम पूर्णत्वास नेण्यासाठी या शेतकºयांकडून धावपळ सुरू आहे.हे केवळ जलसाठा वाढविण्यासाठीच नव्हे तर पिकांना क्षारमुक्त पाणी देण्यासाठी देखील पाण्याचे योग्य नियोजन करीत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जिवजंतू शिवाय पिकांना देखील धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी बहुतांश शेतकºयांकडूून विहिरीत सोडले जात आहे. कुपनलिकेच्या या पाण्यात विहीरीतील झºयांचे पाणी मिसळल्याने त्या पाण्यातील क्षार कमी होत असून ते पाणी रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देणारे ठरत आहे. म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांकडून या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
४कुपनलिकेचे पाणी क्षारयुक्त असून तसे पाणी जिवजंतूला धोक्याचे ठरते. त्यामुळे पिण्यासाठी शिवाय स्वयंपाकासाठीही त्याचा वापर केला जात नाही. भांडी फुटत असल्याने त्याचा साठा करणे देखील टाळले जाते. क्षारयुक्त पाणी पिकांना दिल्यास पिकांची वाढच होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत टाकत विहिरीतील झऱ्यांमुळे क्षार कमी होते. त्यामुळे हे पाणी पिकवाढीसाठी उपयुक्त ठरते.विहीरींमध्ये कमी जलसाठा असतो, त्यातून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नाही. हा जलसाठा वाढविण्यासाठी कुपनलिकेतील पाणी विहीरीत सोडले जात आहे. त्यातून हंगाम पूर्णत्वास नेता येतो.शेतीकामासाठी आधी कुपनलिकेचे नियोजन केले जात असल्याने प्रत्येक बांधावर कुपनलिका दिसन येतात. जवळ-जवळ कुपनलिकांमुळे त्या कोरड्या पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरड्या पडल्यास पिकांना पाणीच देता येणार नाही. त्यातून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी विहीरींमध्ये पाणी सोडले जात आहे.