शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

नदी-नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने खेडले शिवारात पिकासह शेती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक सिंचनचे साहित्य वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.बोरद, मोड, खेडले, खरवड, कढेल, आष्टे, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर, लाखापूर (फॉ.), तळवे, आमलाड, धानोरा, चौगाव बुद्रुक, मोरवड आदी गावातील शेतक:यांच्या शेतांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. खेडले शिवारातील उषाबाई दिलीप चौधरी यांच्या शेतात निझरा नदीचे पाणी शिरल्याने दोन एकर क्षेत्रातील केळीचे पीक वाहून गेले. शकुंतलाबाई अशोक चौधरी यांच्या शेतातील मिरची व कापसाचे पीकही वाहून गेले. रोहिदास फकिरा शिंदे, भाईदास फकिरा शिंदे, इंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत, कैलास गोरख पाटील, पुरुषोत्तम रामदास चव्हाण, रमेश गोरख पाटील, चिंतामण कामनकर, आनंदा कामनकर, भगवान देवराम शिंदे, अंबालाल छगन नवले, नरोत्तम कोळी, अनिल कोळी, सुभाष    तुमडू पाटील, भिमा गिरधर चौधरी, गुलाबसिंग गिरासे, सुनीता गिरासे, लिंबा कायसिंग वळवी, अशोक प्रल्हाद पाटील, अरुण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, नंदूगीर गोसावी, रतिलाल  तोताराम पाटील, बुलाखी रामदास पाटील, बबन वेडू चौधरी, रमण टिला चौधरी यांच्यासह इतर शेतक:यांच्या शेतात           नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने ठिबक सिंचन साहित्यासह पिके वाहून गेली आहेत. नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसान            भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.मागीलवर्षी कोरडा दुष्काळ तर यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी निघून जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तळोदा तालुक्यातील मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तळोदा ते बोरद हाच मार्ग सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी.जे. वळवी यांना दूरध्वनीवरुन याबाबत माहिती दिली. वळवी यांनी संबंधितांना पाठवून पुलाला भराव करण्याची सूचना केली आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाल्याने झाडे व शेतातील केळी पिकाचे खांब वाहून आल्याने ते ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे पाणी निघण्यास अडचण निर्माण होत असून संबंधित विभागाने ही झाडे काढण्याची मागणी होत आहे.