शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

नदी-नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने खेडले शिवारात पिकासह शेती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक सिंचनचे साहित्य वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.बोरद, मोड, खेडले, खरवड, कढेल, आष्टे, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर, लाखापूर (फॉ.), तळवे, आमलाड, धानोरा, चौगाव बुद्रुक, मोरवड आदी गावातील शेतक:यांच्या शेतांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. खेडले शिवारातील उषाबाई दिलीप चौधरी यांच्या शेतात निझरा नदीचे पाणी शिरल्याने दोन एकर क्षेत्रातील केळीचे पीक वाहून गेले. शकुंतलाबाई अशोक चौधरी यांच्या शेतातील मिरची व कापसाचे पीकही वाहून गेले. रोहिदास फकिरा शिंदे, भाईदास फकिरा शिंदे, इंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत, कैलास गोरख पाटील, पुरुषोत्तम रामदास चव्हाण, रमेश गोरख पाटील, चिंतामण कामनकर, आनंदा कामनकर, भगवान देवराम शिंदे, अंबालाल छगन नवले, नरोत्तम कोळी, अनिल कोळी, सुभाष    तुमडू पाटील, भिमा गिरधर चौधरी, गुलाबसिंग गिरासे, सुनीता गिरासे, लिंबा कायसिंग वळवी, अशोक प्रल्हाद पाटील, अरुण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, नंदूगीर गोसावी, रतिलाल  तोताराम पाटील, बुलाखी रामदास पाटील, बबन वेडू चौधरी, रमण टिला चौधरी यांच्यासह इतर शेतक:यांच्या शेतात           नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने ठिबक सिंचन साहित्यासह पिके वाहून गेली आहेत. नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसान            भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.मागीलवर्षी कोरडा दुष्काळ तर यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी निघून जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तळोदा तालुक्यातील मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तळोदा ते बोरद हाच मार्ग सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी.जे. वळवी यांना दूरध्वनीवरुन याबाबत माहिती दिली. वळवी यांनी संबंधितांना पाठवून पुलाला भराव करण्याची सूचना केली आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाल्याने झाडे व शेतातील केळी पिकाचे खांब वाहून आल्याने ते ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे पाणी निघण्यास अडचण निर्माण होत असून संबंधित विभागाने ही झाडे काढण्याची मागणी होत आहे.