शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

नदी-नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने खेडले शिवारात पिकासह शेती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक सिंचनचे साहित्य वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.बोरद, मोड, खेडले, खरवड, कढेल, आष्टे, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर, लाखापूर (फॉ.), तळवे, आमलाड, धानोरा, चौगाव बुद्रुक, मोरवड आदी गावातील शेतक:यांच्या शेतांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. खेडले शिवारातील उषाबाई दिलीप चौधरी यांच्या शेतात निझरा नदीचे पाणी शिरल्याने दोन एकर क्षेत्रातील केळीचे पीक वाहून गेले. शकुंतलाबाई अशोक चौधरी यांच्या शेतातील मिरची व कापसाचे पीकही वाहून गेले. रोहिदास फकिरा शिंदे, भाईदास फकिरा शिंदे, इंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत, कैलास गोरख पाटील, पुरुषोत्तम रामदास चव्हाण, रमेश गोरख पाटील, चिंतामण कामनकर, आनंदा कामनकर, भगवान देवराम शिंदे, अंबालाल छगन नवले, नरोत्तम कोळी, अनिल कोळी, सुभाष    तुमडू पाटील, भिमा गिरधर चौधरी, गुलाबसिंग गिरासे, सुनीता गिरासे, लिंबा कायसिंग वळवी, अशोक प्रल्हाद पाटील, अरुण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, नंदूगीर गोसावी, रतिलाल  तोताराम पाटील, बुलाखी रामदास पाटील, बबन वेडू चौधरी, रमण टिला चौधरी यांच्यासह इतर शेतक:यांच्या शेतात           नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने ठिबक सिंचन साहित्यासह पिके वाहून गेली आहेत. नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसान            भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.मागीलवर्षी कोरडा दुष्काळ तर यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी निघून जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तळोदा तालुक्यातील मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तळोदा ते बोरद हाच मार्ग सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी.जे. वळवी यांना दूरध्वनीवरुन याबाबत माहिती दिली. वळवी यांनी संबंधितांना पाठवून पुलाला भराव करण्याची सूचना केली आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाल्याने झाडे व शेतातील केळी पिकाचे खांब वाहून आल्याने ते ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे पाणी निघण्यास अडचण निर्माण होत असून संबंधित विभागाने ही झाडे काढण्याची मागणी होत आहे.