शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांसाठी ठाणेपाडा ता.नंदुरबार येथील लघुतलावातून शेतक:यांना सिंचनासाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांसाठी ठाणेपाडा ता.नंदुरबार येथील लघुतलावातून शेतक:यांना सिंचनासाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, पाणी पुरवठय़ासाठी कुठल्याही अडचणी येऊ नये, यासाठी लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा व शनिमांडळ या क्षेत्रातील शेतक:यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणेपाडा येथील लघुतलाव यंदा दमदार पावसामुळे चांगला भरला आहे. त्यामुळे हा तलाव यंदाच्या रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी आधारभूत ठरत आहे. या तलावाचे दोन्ही कालवे व पाटचारी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाटबंधारे विभाग, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कॅनॉल निरीक्षक कोळी, डीएससी संस्थेचे कार्यकारी संचालक मोहन शर्मा, प्रकल्प संचालक जितेंद्र सोनवणे, राकेश अहिरराव सुधिर मावची, चंद्रकांत देवरे, शामकांत पाटील, जयदीप पनवार, प्रकाश सोनवणे, सुकन्या देवरे, भाग्यश्री राठोड आदी उपस्थित होते. यावेळी ठाणेपाडा धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धरणातून शेतक:यांना समान पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. यासाठी पाणी वापर संस्था देखील स्थापन करण्याचा निर्णय घेत त्याद्वारे सिंचन व्यवस्थापन करीत सर्व शेतक:यांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रय} केला जाणार आहे. बैठकीत लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. त्यात ठाणेपाठा व शनिमांडळ परसरातील शेतक:यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. त्यांच्याकडून धरणाच्या कालव्यांमध्ये वाढलेली झाडे, झुडपे काढण्यात आली. त्याशिवाय पाटचारींची देखील दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ठाणेपाडा व शनिमांडळ भागातील बहुसंख्य शेतक:यांना या धरणातील पाणी उपलब्ध होणार आहे. 

ठाणेपाडा धरणातील पाणी व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कुठल्याही शेतक:यावर अन्याय न होता समान पद्धतीने पाण्याचे वाटप करता येणार आहे. शेतक:यांच्या हितासाठी विविध निर्णय घेणे व नियोजनासाठी सात सदस्सांची एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीमार्फत पाणी वाटपाच्या नियोजनासह सिंचन, व्यवस्थापन, नियम-अटी तयार करण्यात येणार आहे. या अटीनुसारच पाणी वाटप करण्यात येणार आहे.शेतक:यांच्या सिंचन सुविधांसाठी काम करतांना शेतक:यांना भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठी विविध उपक्रम देखील घेण्यात येणार आहे. त्यात शेतीच्या नवीन व सुधारित पद्धती, सिंचनाचे तंत्रज्ञान, पिक पद्धती यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतक:यांच्या सर्वागिण विकासासाठी शेतीशाळा, पिक प्रात्यक्षिके, माती परिक्षण हे उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकरी गट स्थापन करीत त्यांना गांडुळ खत निर्मिती, बिज प्रक्रिया हे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या विकासात भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.