शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

‘पुनर्वसन डे’ उरला नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांचे वैयक्तिक व वसाहतींमधील प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांचे वैयक्तिक व वसाहतींमधील प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने दर आठवडय़ास वसाहतींमध्ये सुरू केलेला  ‘पुनर्वसन डे’ गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद झालेला आहे. यामुळे वसाहतधारकांच्या समस्यांमध्ये ही वाढ झाल्याचे विस्थापितांचे म्हणणे आहे.बाधित झालेल्या अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात साधारण साडेचार हजार विस्थापीतांचे तळोदा-शहादा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, सरदार नगर, रेवानगर, नर्मदानगर, गोपाळपूर पुनर्वसन, त:हावद पुनर्वसन, आमलीबारी, मोड, वडछील, वाडी अशा साधारण  11 वसाहतींमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून पुनर्वसन करण्यात आले आहे. या वसाहतीमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन झालेल्या असतांना त्यांच्या समस्या व वैयक्तिक प्रश्न कायम होते. वसाहतींमधील विस्थापितांनी आपल्या प्रश्नांसाठी जिल्हा प्रशासन, सरदार सरोवर कार्यालय अथवा नर्मदा विकास विभाग यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत असत. एवढे करूनही त्यांच्या समस्या जैसे थेच राहत होत्या. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सन 2017 पासून दर आठवडय़ास पुनर्वसन डे हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमासाठी श्रेणी एकच्या नोडल अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय महसूल, वीज वितरण, कृषी, पंचायत समिती, नर्मदा विकास विभाग, लघु पाटबंधारे, सरदार सरोवर प्रकल्प अशा सर्व यंत्रणांच्या अधिका:यांनी सहभागी होण्याची सक्ती होती. त्यामुळे अधिका:यांच्या संपूर्ण फौजफाटा प्रत्यक्ष वसाहतींमध्ये हजर राहत असे. संपूर्ण शासन वसाहतधारकांच्या दारीच येत असे. साहजिकच या उपक्रमामुळे वसाहतींमधील सर्व रहिवाशी उत्साहाने पुनर्वसन डे ला हजेरी लावून आपले प्रश्न मांडत असत. अधिका:यांनी त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्याबाबत काय पाठपुरावा केला. त्याविषयीची कार्यवाही त्यांना  अवगत केली जात  होती. त्यामुळे सर्वच यंत्रणांनाना विस्थापितांच्या समस्यांविषयी अलर्ट राहावे लागत होते. जिल्हा प्रशासनाच्या या  उपक्रमामुळे विस्थापितांचे सिंचन, घरप्लॉट, पाणीपुरवठा, शिक्षण, अंगणवाडय़ा, आदी समस्या सोडविल्या जात होत्या असे बाधित सांगतात. तथापि गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विस्थापितांच्या वसाहतींमध्ये सुरू असलेला हा पुनर्वसन डे बंद पडलेला आहे. परिणामी वसाहतींमधील समस्यांमध्ये भर पडली आहे. नूतन प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन बंद झालेला हा उपक्रम तातडीने सुरू करावा, अशी मागणी वसाहतधारकांमधून केली जात आहे. अन्यथा या प्रकरणी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रकल्पातील विस्थापितांच्या प्रश्नासाठी शासनोन जिल्हास्तरावर जिल्हा पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये बाधितांचे प्रतिनिधींच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आल्याने साहजिकच त्यांचे प्रश्न बैठकीत मांडून त्यावर उपाययोजना केल्या जात असतात. दर महिन्याला या समितीची बैठक होत असते. परंतु गेल्या चार महिन्यापासून या समितीच्या बैठकीस ब्रेक लागला आहे