शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील वास्तव प्रश्नांवर चर्चा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात कुपोषण आणि अर्भक मृत्यूबाबत सातत्याने चर्चेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात महिला व ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : राज्यात कुपोषण आणि अर्भक मृत्यूबाबत सातत्याने चर्चेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालहक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने वर्षानुवर्ष जिल्ह्यातील प्रश्न आहेत तसेच आहेत. विधी मंडळाची महिला व बालकल्याण समिती तीन दिवस जिल्ह्यात येत असल्याने किमान या समितीने वास्तव प्रश्नावर चर्चा करून प्रश्न कायमस्वरूपी सुटतील याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे.

राज्यात सध्या सर्वाधिक कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अतितीव्र कुपोषित तीन हजार ४३९ तर मध्यम कुपोषित १८ हजार ६५८ बालके आहेत. कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाणही जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास ३५ टक्क्यांवर आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक बाळाचा जन्म हा रुग्णालयातच व्हावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास ३५ ते ४० टक्के बाळांचा जन्म घरी होतो. रस्त्यांचा प्रश्न अतिदुर्गम भागात कायम असल्याने महिलांना प्रसूतीसाठी आजही बांबूलन्सवर घेऊन जावे लागते. तब्बल आठ ते १० किलोमीटर झोळी करून प्रसूत कळा सोसणाऱ्या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतात. या काळात संबंधित महिलेला काय वेदना होत असतील ते तिलाच ठावूक. पण वर्षानुवर्षे ही परिस्थिती बदलण्यासाठी गांभीर्याने पावले उचलले जात नसल्याने कुपोषित बालकांच्या प्रश्नांवर ठोस मार्ग निघत नाही.

या बालकांवर उपचारासाठीदेखील प्रशासन तेवढे गंभीर दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता एकीकडे कुपोषित बालकांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर स्वतंत्र उपचारासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. उलट शासनाने बाल उपचार केंद्राच्या ज्या इमारती बांधल्या आहेत त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण नसले तरी कोरोनासाठी आरक्षित करून ठेवल्या आहेत. अगदी नवापूर येथील चित्र पाहिल्यास या तालुक्यात ३२५ अतितीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना उपचारासाठी तेथील उपजिल्हा रुग्णालयातच सीटीसी अर्थात बाल उपचार केंद्राची इमारत तयार असली तरी ही इमारत आरोग्य विभाग कुपोषित बालकांच्या उपचारासाठी वापरण्यास तयार नाही. ती कोविड कक्ष म्हणून आहे. साहजिकच बालकांवर रुग्णालयात उपचार होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे आकडेवारीचा खेळ कागदावरच रंगत असल्याने वास्तव प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा होत नाही.

यापार्श्वभूमीवर विधीमंडळ महिला व बाल हक्क समिती जिल्ह्यात येत असल्याने जिल्ह्यातील महिला आणि बाल हक्काच्या वास्तव प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

आठ कि.मी.बांबूलन्सवर गर्भवती महिलेचा प्रवास

सातपुड्यातील दुर्गम भागात रुग्णांना रस्ते नसल्याने झोळी करून रुग्णालयात घेऊन जाण्याची प्रथा कायम आहे. गेल्या ४ सप्टेंबरलादेखील केलापाणी, ता.धडगाव येथील केलीबाई राज्या चौधरी (२४) या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी धडगाव रुग्णालयात नेताना प्रचंड हाल झाले. या महिलेला केलापाणी ते मोंडल गाव असे आठ किलोमीटर अंतर झोळीने पायी घेऊन जावे लागले. त्यानंतर तेथून दिप्या वळवी यांच्या खासगी वाहनाने तिला धडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिने कन्येला जन्म दिला. असे प्रकार सातत्याने सुरू आहे. एवढा त्रास सहन करून सर्वच महिला प्रसूतीसाठी रुग्णलायात येतातच असे नाही.