शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिकी बोट धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : पावसाळा सुरू असल्याने हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रकाशा बॅरेजचेदेखील १६ गेट पूर्णत: वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रकाशा : पावसाळा सुरू असल्याने हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रकाशा बॅरेजचेदेखील १६ गेट पूर्णत: वर करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती असतानादेखील नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन मात्र, यात गंभीर नाही. शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेली आपत्ती व्यवस्थापनाची एक बोट झाडांमध्ये तर दुसरी रबरी बोट समाज मंदिरात गुंडाळून ठेवली आहे. दोन दिवसावर ऋषिपंचमी, गणेश उत्सव येऊन ठेपल्याने महिला भाविक मोठ्या संख्येने तापी काठावर येतात. त्याअनुषंगाने त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रकाशा येथे दोन बोटी दिलेल्या आहेत. एक फायबर बॉडीची तर दुसरी रबरी बोट आहे. या दोन्ही बोटी प्रकाशा येथे आहेत. मात्र, फायबर बोट अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. यावरून नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. सध्या पावसाळा संपण्याच्या मार्गावर असून, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हतनूर धरणानेदेखील दोन दिवसापासून १४ गेट उघडले आहे. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सुलवाडा, सारंखेडा येथील दोन्ही बॅरेजचे गेटदेखील खुले करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशा येथे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रकाशा येथे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रकाशा बॅरेजने सतर्कता म्हणून १६ गेट पूर्णत: खुले केले आहेत तर दोन गेट अर्धे उघडले आहेत. मात्र, अशा पूर परिस्थितीतदेखील आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिक बोट झाडांमध्ये पडून आहे तर दुसरी रबरी बोट एका समाज मंडपामध्ये धूळखात पडून आहे. पावसाळा सुरू असूनही आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी मात्र, पाण्याबाहेर का? यामुळे आपत्ती व्यवस्थापन किती सतर्क आहे हे त्याचे जीवंत उदाहरण म्हणावे लागेल. पूर्ण पावसाळा निघून चालला मात्र अद्यापही यांत्रिकी बोट सज्ज ठेवलेल्या नाहीत. जर अशातच नदीत कोणी वाहून आले किंवा काही अप्रिय घटना घडल्यास त्यांना वाचवेल कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.

ऋषिपंचमी दोन दिवसावर

ऋषीपंचमी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना नसताना ऋषिपंचमीला लाखो महिला भाविक आल्या होत्या. याप्रसंगी प्रकाशा येथील तरुण जे पुण्याहून ट्रेनिंग घेऊन आलेत अशांची ड्युटी लावली होती आणि त्यांनीच नदीत स्नान करताना एक दुर्घटना घडत असताना महिलेला वाचवले होते. आता ऋषीपंचमी दोन दिवसावर आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. ऋषिपंचमीला अप्रिय दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पट्टीचा पोहणाऱ्यांना ट्रेनिंग मात्र आता पैसे नाही

पुणे येथे नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रकाशा येथील १२ लोकांची टीम प्रशिक्षणासाठी २०१५ मध्ये पाठवली होती. हे युवक ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर दरवर्षी गणपतीला, ऋषिपंचमीला, दशा माता विसर्जनाच्यावेळी सज्ज असतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून त्यांना पैसे अदा न झाल्याने ते घरीच आहेत. त्याना मागील मेहनताना मिळावा यासाठी आस लावून बसलो आहेत. आता दोन दिवसावर ऋषिपंचमी आली आहे. त्यानंतर गणेश विसर्जन होणार असल्याने याठिकाणी पट्टीच्या पोहणाऱ्यांना सज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर त्यांना त्यांचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे.