शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

ऐन पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिकी बोट धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : पावसाळा सुरू असल्याने हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रकाशा बॅरेजचेदेखील १६ गेट पूर्णत: वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रकाशा : पावसाळा सुरू असल्याने हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रकाशा बॅरेजचेदेखील १६ गेट पूर्णत: वर करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती असतानादेखील नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन मात्र, यात गंभीर नाही. शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेली आपत्ती व्यवस्थापनाची एक बोट झाडांमध्ये तर दुसरी रबरी बोट समाज मंदिरात गुंडाळून ठेवली आहे. दोन दिवसावर ऋषिपंचमी, गणेश उत्सव येऊन ठेपल्याने महिला भाविक मोठ्या संख्येने तापी काठावर येतात. त्याअनुषंगाने त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रकाशा येथे दोन बोटी दिलेल्या आहेत. एक फायबर बॉडीची तर दुसरी रबरी बोट आहे. या दोन्ही बोटी प्रकाशा येथे आहेत. मात्र, फायबर बोट अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. यावरून नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. सध्या पावसाळा संपण्याच्या मार्गावर असून, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हतनूर धरणानेदेखील दोन दिवसापासून १४ गेट उघडले आहे. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सुलवाडा, सारंखेडा येथील दोन्ही बॅरेजचे गेटदेखील खुले करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशा येथे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रकाशा येथे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रकाशा बॅरेजने सतर्कता म्हणून १६ गेट पूर्णत: खुले केले आहेत तर दोन गेट अर्धे उघडले आहेत. मात्र, अशा पूर परिस्थितीतदेखील आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिक बोट झाडांमध्ये पडून आहे तर दुसरी रबरी बोट एका समाज मंडपामध्ये धूळखात पडून आहे. पावसाळा सुरू असूनही आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी मात्र, पाण्याबाहेर का? यामुळे आपत्ती व्यवस्थापन किती सतर्क आहे हे त्याचे जीवंत उदाहरण म्हणावे लागेल. पूर्ण पावसाळा निघून चालला मात्र अद्यापही यांत्रिकी बोट सज्ज ठेवलेल्या नाहीत. जर अशातच नदीत कोणी वाहून आले किंवा काही अप्रिय घटना घडल्यास त्यांना वाचवेल कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.

ऋषिपंचमी दोन दिवसावर

ऋषीपंचमी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना नसताना ऋषिपंचमीला लाखो महिला भाविक आल्या होत्या. याप्रसंगी प्रकाशा येथील तरुण जे पुण्याहून ट्रेनिंग घेऊन आलेत अशांची ड्युटी लावली होती आणि त्यांनीच नदीत स्नान करताना एक दुर्घटना घडत असताना महिलेला वाचवले होते. आता ऋषीपंचमी दोन दिवसावर आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. ऋषिपंचमीला अप्रिय दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पट्टीचा पोहणाऱ्यांना ट्रेनिंग मात्र आता पैसे नाही

पुणे येथे नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रकाशा येथील १२ लोकांची टीम प्रशिक्षणासाठी २०१५ मध्ये पाठवली होती. हे युवक ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर दरवर्षी गणपतीला, ऋषिपंचमीला, दशा माता विसर्जनाच्यावेळी सज्ज असतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून त्यांना पैसे अदा न झाल्याने ते घरीच आहेत. त्याना मागील मेहनताना मिळावा यासाठी आस लावून बसलो आहेत. आता दोन दिवसावर ऋषिपंचमी आली आहे. त्यानंतर गणेश विसर्जन होणार असल्याने याठिकाणी पट्टीच्या पोहणाऱ्यांना सज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर त्यांना त्यांचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे.