शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात खतांसाठी दुकानांसमोर लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाली असून, खत घेण्यासाठी दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाली असून, खत घेण्यासाठी दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. युरीया सोबत इतर खतांची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.पेरणी झाल्यानंतर शेतकºयांची आता पिकांना रासायनिक खते देण्याची लगबग सुरू झाली आहे. रासायनिक खते घेण्यासाठी शहरातील कृषी दुकानांवर शेतकºयांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत, असे असले तरी युरीया बरोबरच इतर खते घेण्याची सक्ती व्यावसायिकांकडून केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. वरूनच खतांची लिंकिंग केल्याचे म्हटले जात आहे. परंतु शेतकºयांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सहन करून इतर खतेही घ्यावी लागत असल्याची शेतकºयांची व्यथा आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी दखल घेण्याची मागणी आहे. दरम्यान खतांसाठी कृषी दुकानांवर शेतकºयांच्या होत असलेल्या रांगांमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच शेतकºयांनी युद्ध पातळीवर पेरणी उरकली असून, पिकांना रासायनिक खते देण्याची शेतकºयांनी लगबग सुरू केली आहे. साहजिकच रासायनिक खते घेण्यासाठी तळोदा शहरातील कृषी प्रतिष्ठानांवर शेतकºयांच्या रांगा दिसून येत असल्या तरी पिकांच्या वाढीसाठी टॉनिक असलेल्या युरीयालाच शेतकºयांची अधिक मागणी होत आहे. परंतु नेमके युरीयाचीच टंचाई भासत आहे. वरिष्ठ पातळीवरून युरीया पुरेसे येत नसल्यामुळे शेतकºयांचीही पंचाईत झाली आहे.कृषी प्रतिष्ठानांकडून युरीयाबरोबर इतर रासायनिक खते घेण्याची शक्ती केली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. नाईलाजास्तव शेतकºयांना इतर खतेही घ्यावे लागत आहे. परिणामी शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची व्यथा शेतकºयांनी बोलून दाखविली आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे केळी, पपई, कापूस या नगदी पिकांच्या असलेल्या भावामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यातून आकसे बसे सावरत शेतकरी पुन्हा खरीप हंगामाला लागून आपली एकाग्रता पिकाकडे लावली आहे. निदान शासनाने रासायनिक खते तरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. एवढेच नव्हे शेतकºयांची मालकीची असलेली तालुका खरेदी-विक्री संघाने मागणी करूनही या संस्थेला युरीयाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करून देण्यात येत नाही. येथे युरीया उपलब्ध झाले तर शेतकºयांना स्वस्तात खते उपलब्ध होतील. येथील ग्रामपंचायतीनेही दुकानदारांकडून अधिक दराने खते विकून शेतकºयांची आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.रासायनिक खते घेण्यासाठी कृषी दुकानांवर शेतकºयांच्या अक्षरश: रांगा लागल्याने कोरोना महामारीच्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. कारण उभे राहणाºया शेतकºयांमध्ये कधीच अंतर राखले जात नाही. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापराबाबत पोलीस प्रशासन इतरांवर कारवाई करीत आहेत. प्रतिष्ठानांवर लागलेल्या रांगांबाबत का? ठोस कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.