शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी विकासासाठी पालिकेने सुमारे 17 कोटींचा आराखडाही     तयार केला असल्याची माहिती   जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी दिली.गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहादा शहर पूर्णत: जलमय झाले होते. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होता. त्यामुळे जनजीवनही ठप्प झाले होते. सध्या पाणी कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अभिजित पाटील यांनी सांगितले की, शहरातून गेलेल्या  पाटचारी हा शहरासाठी गंभीर प्रश्न झाला आहे. जलसंपदा विभागाच्या पाटचा:या शहराच्या मध्यवर्ती भागातून जातात. या दोन पाटचा:या असून त्या नागरी वस्तीतून अनुक्रमे 2.2 किलोमीटर व दुसरी पाटचारी 3.91 किलोमीटर लांबीची आहे. या पाटचा:या ब्रिटिशकालीन आहेत. पाटचा:यांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. पाटचा:यांमध्ये प्लास्टीकच्या बाटल्या, गाळ, पालापाचोळा साचला असल्याने  त्यात प्रचंड घाण आहे. गेल्यावर्षी पालिकेने स्वखर्चातून नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन त्याची साफसफाई केली होती. काहींनी पाटचारींवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या चा:यांमध्ये पाणी येत असल्याने गेल्या काही वर्षापासून शहराला पाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या पाटचा:यांचा शहरी हद्दीतील भाग जलसंपदा विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच सभेत हा ठराव केला होता व तो जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. गेल्या दोन वर्षापासून आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करीत आहोत. जळगाव कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालयात असून यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशीही बोलणे झाले आहे. लवकरच हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने या जागेवर सुशोभिकरण व विकासाची कामे करण्यासाठी सुमारे 17 कोटींचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे पाटचारी जलसंपदा विभागाने पालिकेकडे त्वरित हस्तांतरीत करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात लवकरच आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. शहादा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून उपाययोजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.