शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी विकासासाठी पालिकेने सुमारे 17 कोटींचा आराखडाही     तयार केला असल्याची माहिती   जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी दिली.गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहादा शहर पूर्णत: जलमय झाले होते. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होता. त्यामुळे जनजीवनही ठप्प झाले होते. सध्या पाणी कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अभिजित पाटील यांनी सांगितले की, शहरातून गेलेल्या  पाटचारी हा शहरासाठी गंभीर प्रश्न झाला आहे. जलसंपदा विभागाच्या पाटचा:या शहराच्या मध्यवर्ती भागातून जातात. या दोन पाटचा:या असून त्या नागरी वस्तीतून अनुक्रमे 2.2 किलोमीटर व दुसरी पाटचारी 3.91 किलोमीटर लांबीची आहे. या पाटचा:या ब्रिटिशकालीन आहेत. पाटचा:यांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. पाटचा:यांमध्ये प्लास्टीकच्या बाटल्या, गाळ, पालापाचोळा साचला असल्याने  त्यात प्रचंड घाण आहे. गेल्यावर्षी पालिकेने स्वखर्चातून नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन त्याची साफसफाई केली होती. काहींनी पाटचारींवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या चा:यांमध्ये पाणी येत असल्याने गेल्या काही वर्षापासून शहराला पाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या पाटचा:यांचा शहरी हद्दीतील भाग जलसंपदा विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच सभेत हा ठराव केला होता व तो जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. गेल्या दोन वर्षापासून आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करीत आहोत. जळगाव कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालयात असून यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशीही बोलणे झाले आहे. लवकरच हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने या जागेवर सुशोभिकरण व विकासाची कामे करण्यासाठी सुमारे 17 कोटींचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे पाटचारी जलसंपदा विभागाने पालिकेकडे त्वरित हस्तांतरीत करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात लवकरच आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. शहादा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून उपाययोजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.