शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

50 टंचाईग्रस्त गावांकडून विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:08 IST

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ...

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ठिकाणी विहिर अधिग्रहण करुन देण्यात प्रशासनाला यश आले असले तरी याव्यतिरिक्त 50 गावांकडून विहिर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दिले गेल्याने तालुक्यातील पाणीटंचाई भीषण झाल्याचे स्पष्ट झाले आह़े पाणीटंचाई कृती आराखडय़ानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 35 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 34 गावे ही एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील आहेत़ तर केवळ एक गाव शहादा तालुक्यातील आहेत़ पाणीटंचाई भेडसावणा:या या गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी 92 लाख 34 हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आह़े या खर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे सुरु आह़े यात आतार्पयत तीन गावांच्या विहिरींचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले असले, तरी पंचायत समितीकडे विहिर अधिग्रहणासाठी 50 ग्रामपंचायतींनी स्वतंत्र प्रस्ताव दिले आहेत़ यातून मंजूर केलेला खर्च आणि वाढलेली गावांची संख्या यांचा ताळमेळ बसणार नसल्याने प्रशासनाला नवीन खर्च मंजूरी द्यावी लागण्याची चिन्हे आहेत़ स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पंचायत समितीकडे दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येऊन तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सोपवून अधिग्रहण करण्यात येत आह़े यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले असल्याचे म्हटले आह़े परंतू गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ांमुळे शासकीय कामकाज ठप्प होत़े सोमवारपासून कामकाज सुरु झाल्याने येत्या आठवडय़ात टंचाईनिवारणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, कोळदे, लहान शहादे, शिंदे, निंभेल, कं्रढे, घोटाणे, सातुर्के, भालेर, ओसर्ली, कानळदा, न्याहली, भादवड, बलदाणे, कार्ली, बलवंड, पळाशी, इंद्रीहट्ट, उमर्दे बुद्रुक, तिलाली, सैताणे, तलवाडे, खर्दे खुर्द, दहिंदुले खुर्द, शिंदगव्हाण, चौपाळे, तिसी, बामडोद, उमर्दे बुद्रुक, वडवद, मांजरे, होळ तर्फे रनाळे या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करण्यासाठी खर्चास मंजूरी देण्यात आली आह़े यातील रनाळे, तलवाडे बुद्रुक आणि घोटाणे या गावांनी प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ विहिरींचे अधिग्रहण करुन टंचाई दूर करण्यास प्रशासनाला यश आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू उर्वरित 31 गावामध्ये अद्यापही अधिग्रहण आणि पाईपलाईनच्या कामांना गती मिळालेली नाही़