शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

50 टंचाईग्रस्त गावांकडून विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:08 IST

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ...

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ठिकाणी विहिर अधिग्रहण करुन देण्यात प्रशासनाला यश आले असले तरी याव्यतिरिक्त 50 गावांकडून विहिर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दिले गेल्याने तालुक्यातील पाणीटंचाई भीषण झाल्याचे स्पष्ट झाले आह़े पाणीटंचाई कृती आराखडय़ानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 35 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 34 गावे ही एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील आहेत़ तर केवळ एक गाव शहादा तालुक्यातील आहेत़ पाणीटंचाई भेडसावणा:या या गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी 92 लाख 34 हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आह़े या खर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे सुरु आह़े यात आतार्पयत तीन गावांच्या विहिरींचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले असले, तरी पंचायत समितीकडे विहिर अधिग्रहणासाठी 50 ग्रामपंचायतींनी स्वतंत्र प्रस्ताव दिले आहेत़ यातून मंजूर केलेला खर्च आणि वाढलेली गावांची संख्या यांचा ताळमेळ बसणार नसल्याने प्रशासनाला नवीन खर्च मंजूरी द्यावी लागण्याची चिन्हे आहेत़ स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पंचायत समितीकडे दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येऊन तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सोपवून अधिग्रहण करण्यात येत आह़े यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले असल्याचे म्हटले आह़े परंतू गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ांमुळे शासकीय कामकाज ठप्प होत़े सोमवारपासून कामकाज सुरु झाल्याने येत्या आठवडय़ात टंचाईनिवारणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, कोळदे, लहान शहादे, शिंदे, निंभेल, कं्रढे, घोटाणे, सातुर्के, भालेर, ओसर्ली, कानळदा, न्याहली, भादवड, बलदाणे, कार्ली, बलवंड, पळाशी, इंद्रीहट्ट, उमर्दे बुद्रुक, तिलाली, सैताणे, तलवाडे, खर्दे खुर्द, दहिंदुले खुर्द, शिंदगव्हाण, चौपाळे, तिसी, बामडोद, उमर्दे बुद्रुक, वडवद, मांजरे, होळ तर्फे रनाळे या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करण्यासाठी खर्चास मंजूरी देण्यात आली आह़े यातील रनाळे, तलवाडे बुद्रुक आणि घोटाणे या गावांनी प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ विहिरींचे अधिग्रहण करुन टंचाई दूर करण्यास प्रशासनाला यश आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू उर्वरित 31 गावामध्ये अद्यापही अधिग्रहण आणि पाईपलाईनच्या कामांना गती मिळालेली नाही़