शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

50 टंचाईग्रस्त गावांकडून विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:08 IST

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ...

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ठिकाणी विहिर अधिग्रहण करुन देण्यात प्रशासनाला यश आले असले तरी याव्यतिरिक्त 50 गावांकडून विहिर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दिले गेल्याने तालुक्यातील पाणीटंचाई भीषण झाल्याचे स्पष्ट झाले आह़े पाणीटंचाई कृती आराखडय़ानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 35 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 34 गावे ही एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील आहेत़ तर केवळ एक गाव शहादा तालुक्यातील आहेत़ पाणीटंचाई भेडसावणा:या या गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी 92 लाख 34 हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आह़े या खर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे सुरु आह़े यात आतार्पयत तीन गावांच्या विहिरींचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले असले, तरी पंचायत समितीकडे विहिर अधिग्रहणासाठी 50 ग्रामपंचायतींनी स्वतंत्र प्रस्ताव दिले आहेत़ यातून मंजूर केलेला खर्च आणि वाढलेली गावांची संख्या यांचा ताळमेळ बसणार नसल्याने प्रशासनाला नवीन खर्च मंजूरी द्यावी लागण्याची चिन्हे आहेत़ स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पंचायत समितीकडे दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येऊन तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सोपवून अधिग्रहण करण्यात येत आह़े यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले असल्याचे म्हटले आह़े परंतू गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ांमुळे शासकीय कामकाज ठप्प होत़े सोमवारपासून कामकाज सुरु झाल्याने येत्या आठवडय़ात टंचाईनिवारणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, कोळदे, लहान शहादे, शिंदे, निंभेल, कं्रढे, घोटाणे, सातुर्के, भालेर, ओसर्ली, कानळदा, न्याहली, भादवड, बलदाणे, कार्ली, बलवंड, पळाशी, इंद्रीहट्ट, उमर्दे बुद्रुक, तिलाली, सैताणे, तलवाडे, खर्दे खुर्द, दहिंदुले खुर्द, शिंदगव्हाण, चौपाळे, तिसी, बामडोद, उमर्दे बुद्रुक, वडवद, मांजरे, होळ तर्फे रनाळे या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करण्यासाठी खर्चास मंजूरी देण्यात आली आह़े यातील रनाळे, तलवाडे बुद्रुक आणि घोटाणे या गावांनी प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ विहिरींचे अधिग्रहण करुन टंचाई दूर करण्यास प्रशासनाला यश आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू उर्वरित 31 गावामध्ये अद्यापही अधिग्रहण आणि पाईपलाईनच्या कामांना गती मिळालेली नाही़