शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

शहादा तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सिंचन प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वतरांगेत ...

ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सिंचन प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या दरा धरणात केवळ ३० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाकी नदीवर उनपदेव पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस दरा धरण बांधण्यात आलेले आहे. वाकी नदीला गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी बारमाही पाणी राहत असे, सध्या मात्र तीन-चार वर्षांपासून हिवाळ्यातच ही नदी कोरडी होते. सातपुडा पर्वतरांगेत धरण असल्याने पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. नैसर्गिक परिस्थिती बघता परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात वाकी नदीला मोठा पूर येतो. मात्र, या वर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाच्या असल्याने धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत भरलेच नाही. गेल्या एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अशीच परिस्थिती तालुक्यातील राणीपूर, सुसरी, दूधखेडा, काकरदा, चिरखाण धरणांची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. जलसाठा कमी होत चालल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सुसरी प्रकल्पाच्या क्षेत्रात १९ गावे सिंचनाखाली येतात. त्यामुळे भविष्यात शेतांमधील बोर कोरडे होतील म्हणून येत्या आठ दिवसांच्या आत नदी-नाल्यांना पूर न आल्यास भीषण दुष्काळाच्या व पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुसरी प्रकल्पात अल्प जलसाठा

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून वाहून येणाऱ्या सुसरी नदीवर धरण बांधण्यात आले आहे. परंतु अल्प प्रमाणात नदीला पूर येत असल्याने सुसरी धरणातदेखील अल्प जलसाठा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.